Advertisements
Advertisements
Question
उत्तार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) कारणे लिहा: (2)
- पंतांची पहिली उडीच शेवटची ठरली, कारण ................
- आचार्य बर्वे शेजारच्या खोलीत असूनही समाचाराला आले नाहीत, कारण ................
|
दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण आठ गुणिले दहाच्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली; परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण ‘उपास’ हे त्यांचे खास राखीव कुरण होते. “हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखं बळी पडला असता, तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हांला क्षमा करतो.” “पण........मी हे मुद्दाम केलं नाही, आचार्य! अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी.” “काही उपयोग होणार नाही!” “का?” “का म्हणजे? जिभेवर ताबा नाही तुमचा. संयम हवा. मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील.” |
(2) आकृतिबंध पूर्ण करा: (2)
दोरीबरील उड्यांचे झालेले परिणाम

(3) स्वमत: (3)
दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हांला समजलेला विनोद स्पष्ट करा.
Advertisements
Solution
(1)
- पतांची पहिली उडी शेवटी ठरली, कारण पहिल्यांदा दोरी फेकताना संपूर्ण फेक अवघड झाला आणि दोरी डोक्यावरून जाऊन टेबलावरील ताटल्या व औषधांच्या बाटल्यांमध्ये अडकली.
- आचार्य बर्वे रोजाच्या खोलीत असूनही समारंभाला आले नाहीत, कारण ते उपवास करत होते व त्यांचा त्रास वाढला होता.
(2) दोरीबरील उड्यांचे झालेले परिणाम

(3) दोरीवर उड्या मारताना विनोद असा आहे की, उड्या मारण्याचा प्रयत्न चांगला असला तरी प्रत्येक वेळी काही ना काही गोंधळ होतो. पहिल्यांदा वस्तू पडतात आणि दुसऱ्यांदा दोरी आचार्यांच्या गळ्यात अडकते. या प्रसंगातून “संयम आणि एकाग्रता नसल्यास काम बिघडते” हा हलका-फुलका पण महत्त्वाचा संदेश मिळतो.
