Advertisements
Advertisements
प्रश्न
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
आई-वडील यांच्यानंतर शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे गुरू असतात. ते विद्यार्थ्यांना ज्ञान, माहिती देत असतात. विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्यही ते करत असतात. शिक्षकांकडून मिळालेली कौतुकाची थाप विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवते, त्यामुळे त्यांना शिक्षणाची गोडी लागण्यासही मदत होते.
मी इयत्ता आठवीत असताना मला गणित विषयाची फार भीती वाटत असे. आमच्या गणित विषयाच्या शिक्षिका सौ. भिसे बाई यांनी एके दिवशी मला बोलावले व समजावले, की 'गणित हा विषय सरावाने छान जमेल तुला. तुझं गणित अगदीच काही कच्चं नाही. तुला काही अडचण आलीच, तर तू कधीही मला विचार.' त्यानंतर, मी नियमितपणे गणिताचा सराव केला. सौ. भिसे बाईंचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत होतेच. त्यानंतरच्या सहामाही परीक्षेत मी गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवले. त्यावर बाईंनी माझे संपूर्ण वर्गासमोर खूप कौतुक केले. अशाप्रकारे, भिसे बाईंमुळे माझी गणिताविषयी भीती कायमची दूर झाली. माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. म्हणूनच मला वाटते, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.
जोड्या जुळवा.
पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा.
| धीट, हजर, सुंदर, स्तुती | भित्रा, गैरहजर, कुरूप, निंदा |
| अ | ब | |
| (१) | ||
| (२) | ||
| (३) | ||
| (४) |
आकृतिबंध पूर्ण करा.

गुणवैशिष्ट्ये लिहा.

कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
खालील आकृतिबंध पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
दुर्घट-
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा.

पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.

‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्वासक झाड-
लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती.
चूक की बरोबर ते लिहा.
लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात. |
१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.
