मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

शास्त्रीय कारणे लिहा. पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे.

थोडक्यात उत्तर
स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. मानवी जीवन हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे आणि मानवाचे जीवन पर्यावरणाशी घट्ट जोडले गेले आहे.
  2. मानवी लोकसंख्या व औद्योगिकीकरण यांची झपाट्याने वाढ होत असल्याकारणाने माणसाकडून नैसर्गिक संसाधनाचा अवाजवी वापर होत आहे व त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.
  3. मानवी जीवनावर पर्यावरणाचा प्रभाव असतो, तसेच मानव आपल्या सोयीनुसार सभोवतालच्या पर्यावरणात बदल घडवून आणू शकतो, कारण अन्नसाखळीत सर्वोच्च भक्षक म्हणून सगळ्यांत वरचे स्थान मानवाचे आहे.
  4. मानवामध्ये निसर्गाचे संवर्धन करण्याची व त्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच निसर्गाचा समतोल साधण्यात मानव प्रमुख भूमिका निभावू शकतो. यामुळे, पर्यावरणामध्ये मानवाला महत्त्वाचे स्थान आहे.
    म्हणूनच, पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे.
shaalaa.com
पर्यावरण संवर्धन : आपली सामाजिक जबाबदारी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: पर्यावरणीय व्यवस्थापन - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 4 पर्यावरणीय व्यवस्थापन
शास्त्रीय कारणे लिहा | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×