Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.
राज्यांच्या पुनर्रचनेविषयी माहिती लिहा:
(अ) झारखंड
(ब) तेलंगणा
(क) उत्तराखंड
सविस्तर उत्तर
Advertisements
उत्तर
स्वातंत्र्योत्तर काळात भारतात भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर प्रथमच इसवी सन २००० मध्ये झारखंड व उत्तराखंड आणि २०१४ मध्ये तेलंगण या तीन स्वतंत्र घटक राज्यांची निर्मिती करण्यात आली.
(अ) झारखंड:
- १९२९ मध्ये झारखंड राज्याची मागणी पुढे आली.
- १९४७ मध्ये अखिल भारतीय झारखंड पार्टीची स्थापना होऊन राज्यनिर्मितीच्या मागणीला वेग देण्यात आला.
- १९७३ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना स्वतंत्र राज्यनिर्मितीचे निवेदन देण्यात आले.
- १९९४ मध्ये बिहारच्या विधानसभेत झारखंड विकास स्वायत्त मंडळ स्थापनेचे विधेयक मंजूर झाले.
- ऑगस्ट २००० मध्ये बिहारचे विभाजन करून स्वतंत्र झारखंड राज्य स्थापन करण्याची तरतूद असणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाले.
- १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.
(ब) तेलंगणा:
- तेलंगणा हे राज्य २०१४ मध्ये अस्तित्वात आले.
- हे राज्य त्यापूर्वी आंध्र प्रदेश या राज्याचा भाग होते.
- तेलंगण राष्ट्रीय समितीने तेलंगण हे वेगळे राज्य घोषित करण्यासाठी आंदोलन सुरू केले.
- २००१ मध्ये भारत सरकारने तेलंगण हे स्वतंत्र राज्य होणार असे जाहीर केले. २०१४ मध्ये संसदेने या प्रस्तावास मान्यता दिली.
- २ जून २०१४ रोजी तेलंगण हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.
(क) उत्तराखंड:
- गढवाल व कुमाऊँ भागातील जनतेने १९३० मध्येच उत्तराखंड राज्याची मागणी केली होती. १९३८ च्या काँग्रेस अधिवेशनात त्याला पाठिंबा देण्यात आला.
- स्वातंत्र्योत्तर काळात फाजल अली आयोगाने उत्तराखंड राज्याची मागणी फेटाळली.
- १९५७ पासून या भागातील जनतेने स्वतंत्र राज्यासाठी आंदोलन सुरू केले.
- १९७३ मध्ये ‘उत्तराखंड पर्वतीय राज्य परिषद’ स्थापन झाली.
- १९९४ मध्ये लोकआंदोलन तीव्र झाले.
- लोकांच्या भावनेची दखल घेऊन उत्तरप्रदेश राज्याच्या विधानसभेत स्वतंत्र राज्याचा ठराव संमत करण्यात आला.
- २००० मध्ये उत्तरांचल हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. पुढे त्याचे उत्तराखंड असे नामांतर झाले.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
