Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विषयी माहिती लिहा:
(अ) स्थापना
(ब) ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेले अधिकार
(क) वखाराच प्रशासन
सविस्तर उत्तर
Advertisements
उत्तर
(अ) स्थापना:
- ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ३१ डिसेंबर १६०० रोजी झाली.
- भारत आणि पूर्वेकडील आशियाई राष्ट्रांशी व्यापार करण्याच्या उद्देशाने या कंपनीची स्थापना झाली.
- इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला.
(ब) ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेले अधिकार:
- कंपनीतील नोकरवर्गाला शिक्षा करणे.
- पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे.
- पुर्वेकडील देशांत किल्ले बांधणे.
- संरक्षणासाठी व युद्धासाठी सैन्य बाळगणे.
- अन्य धर्मीयांशी युदूध वा तह करणे.
(क) वखाराच प्रशासन:
- १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात कंपनीचा कारभार सुरत आणि चेन्नई (मद्रास) येथून चालत असे.
- चेन्नईच्या कार्यकक्षेत भारताचा पूर्वकिनारा, ओडिशा, बंगाल आणि पूर्वेकडील इतर देश होते.
- सुरतेच्या कार्यकक्षेत महाराष्ट्रातील राजापूर, तांबड्या समुद्रातील मोखा, पर्शियन आखातातील बसरा येथील वखारी होत्या.
- सुरतेच्या वखारीत एक हिशेबनीस, एक कोठारप्रमुख, एक खजिनदार, काही वखारदार, कारकून असत.
- या पदाधिकाऱ्यांच्या जोडीला धर्मगुरु, सर्जन व मदतनीस, स्वयंपाकी, प्रेसिडेंटचा नोकर, एक तुतारीवाला असे लोक असत.
- प्रत्यक्ष वखारीत काम करणाऱ्या इंग्रजांमध्ये शिकाऊ उमेदवार (ॲप्रेंटिस), कारकून आणि फॅक्टर असे हुद्दे होते. शिकाऊ उमेदवार ते प्रेसिडेंट सगळे वखारीच्या आवारात राहत असत. तेथे भोजनाची सोय होती.
- कंपनीने संरक्षणासाठी किल्ले बांधण्याचे धोरण सुरू केले.
- मुंबईत इंग्रजांनी टांकसाळ सुरू करून चांदी, तांबे आणि जस्त या धातूंची नाणी पाडण्यास सुरुवात केली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
