मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी विज्ञान (सामान्य) इयत्ता ११ वी

अभिव्यक्ती. राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

अभिव्यक्ती.

राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात अनेक संस्थाने होती. ही संस्थाने खालसा केली गेली. जे संस्थानिक होते, त्यांतील बहुतांश संस्थानिकांची मनोवृत्ती ही हेकेखोर होती. सत्ताधीश म्हणून त्यांच्या वर्तनात रुबाब होता, ऐट होती व नाहक तोरा होता. त्यामुळे राजा व प्रजा यांच्यामधल्या सहभावात फार दरी पडलेली होती. प्रस्तुत नाट्यउताऱ्याच्या संदर्भात यालाच राजवाडा व नंदनवाडी यांच्यातील अंतर असे म्हटले आहे.
राजा हा प्रजेचे पालन करणारा पालक असतो. प्रजेसाठी सखकारी ठरतील अशा योजना कार्यान्वित करणे, हा राजाचा धर्म आहे. त्या काळाचा विचार करता राजवाडा व नंदनवाडी यातले अंतर दूर करण्यासाठी पुढील काही उपाय करायला हवे होते. एकतर राजाने आपला राजवाडा गावापासून वेगळा ठेवायला नको. प्रजेच्या वस्तीस्थानातच राहणे पसंत करावे. राजवाड्याचा दिमाखही थोडा कमी करून कमी क्षेत्राचा राजवाडा सर्वसामान्य दिसेल असा बांधायला हवा. शिवाय प्रजेची देखे जाणून घेण्यासाठी स्वत: जातीने जनता-दरबार भरवायला हवा. प्रजेसाठी योजलेल्या सुखसोयींची अंमलबजावणी होते की नाही, हे स्वतः पाहावे अथवा त्यासाठी निष्ठावंत मंडळींचे कार्यकारी मंडळ असावे. राजेशाहीच्या अंतर्गत लोकशाही नांदायला हवी. आपले कुटुंबही राजाने प्रजेसारखेच मायेने वागवायला हवे. आपले कार्य पुढे नेणारे उत्तराधिकारी । व अनुयायी तयार करणे, हेही परम कर्तव्य समजायला हवे.

shaalaa.com
वाड्मयप्रकार (11th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3.03: सुंदर मी होणार - कृती [पृष्ठ ८६]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
पाठ 3.03 सुंदर मी होणार
कृती | Q (४) (अ) | पृष्ठ ८६

संबंधित प्रश्‍न

थोडक्यात वर्णन करा.

कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास.


थोडक्यात लिहा.

मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग.


थोडक्यात लिहा.

कृष्णराव यांच्या चाहत्याची प्रेमाची जबरदस्ती.


स्वमत.

प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून कृष्णरावांचे व्यक्तिचित्र रेखाटा.


स्वमत.

प्रस्तुत नाट्यउताऱ्यातील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची दोन वैशिष्ट्ये लिहा.


अभिव्यक्ती.

कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.


अभिव्यक्ती.

‘पायधूळ झाडा. त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही’, या वाक्यांतील लक्ष्यार्थ स्पष्ट करा.


खालील कृती करा.


खालील कृती करा.


स्पष्ट करा.

सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे मोहित.


उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.

नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो.


स्वमत.

‘शालूवहिनीचे पुत्रप्रेम नैसर्गिक आहे’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


स्वमत.

शालूवहिनीच्या स्वगतातून मोहितच्या कपड्यांबाबत आलेले विवेचन स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

शालूला सदाने का साथ दिली असावी ते स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

नाट्यउताऱ्याच्या शेवटाबाबत तुमचे विचार लिहा.


खालील कृती करा.


खालील कृती करा.


महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा.

पात प्रतिक्रिया
राजेंद्र  
बेबी  

खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

मुलांचे चिमणे विश्व


थोडक्यात स्पष्ट करा.

‘जीवनाच्या त्या प्रकाशात न्हाऊन आता मला सुंदर व्हायचं आहे!’, या दिदीच्या विधानाचा अर्थ.


स्वमत.

तुम्हांला समजलेली ‘ममी’ ही भूमिका नाट्यउताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.


स्वमत.

रंगसूचना कथानकातील दुवे कसे जोडतात ते स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

नाट्यउताऱ्याद्वारे तुम्हांला समजलेला ‘सुंदर’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून पु. ल. देशपांडे यांच्या संवादलेखनाची वैशिष्ट्येलिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×