Advertisements
Advertisements
प्रश्न
अभिव्यक्ती.
नाट्यउताऱ्याच्या शेवटाबाबत तुमचे विचार लिहा.
Advertisements
उत्तर
नाटककार प्रशांत दळवी यांनी 'ध्यानीमनी' या नाट्य उताऱ्यात शालू वहिनी व सदानंद यांची दोन मोठी स्वगते लिहिली आहेत. मूल आहेच असे मानणाऱ्या शालूवहिनीच्या स्वगतातून तिच्या मनाच्या खोल डोहातील भावतरंग कळतात. पण नाट्यउताऱ्याचा शेवट । सदाच्या स्वगतातून केल्यामुळे संपूर्ण नाट्यउताऱ्याचा तोल सांभाळला जातो.
सदाच्या म्हणण्यातून त्याच्या मनाची घुसमट आणि समंजसपणा, तटस्थपणा यांची प्रचिती येते. डॉ. समीरला सदा शेवटी असे सांगतो की आपले अस्तित्व स्वयंभू नसते. एकमेकांच्या इच्छेखातर आपण जगतो. तू आमचे प्रश्न समजून घेऊ शकणार नाहीस ; कारण नैसर्गिक विषमतेवर कोणताही वैदयकीय उपचार नाही. आहे ती वस्तुस्थिती मी स्वीकारली आहे व जगण्याचे जीवनसत्त्व दुसऱ्यांना दयायचे मी ठरवले आहे. शालूच्या लेखी आता मोहित अस्तित्वात आहे, हे मान्य करावे लागले नाहीतर आमच्या जगण्यातली ऊर्जा निघून जाऊन आम्ही फक्त पांढरेफटक पडू, बर्फाचे निर्जीव पांढरे गोळे ठरू. तुम्ही आमच्या जगातून निघून जा.
नाट्यउताऱ्याच्या या शेवटामुळे मानसिक इच्छा प्राबल्य मनावर ठसवण्यात नाटककार यशस्वी झाले आहेत. मनातील भावतरंगांवर कोणताही बाह्य उपचार नसतो, ते तसेच स्वयंभूपणे वाहत राहण्यातच स्वाभाविकता आहे, हे तत्त्व शेवटी दृढ केले आहे. त्यामुळे वाचकांची व रसिकांची दिङमढ अवस्था होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कारणे लिहा.
फ्लॅशच्या प्रकाशाने कृष्णराव चिडतात कारण...
थोडक्यात वर्णन करा.
कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास.
थोडक्यात लिहा.
मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग.
स्वमत.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून कृष्णरावांचे व्यक्तिचित्र रेखाटा.
स्वमत.
‘कंसातील मजकूर नाट्यउतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो’, तुमचे मत लिहा.
स्वमत.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यातील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची दोन वैशिष्ट्ये लिहा.
अभिव्यक्ती.
मोनिका व कृष्णराव यांच्यातील संवादाची तुम्हांला समजलेली वैशिष्ट्येलिहा.
अभिव्यक्ती.
‘पायधूळ झाडा. त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही’, या वाक्यांतील लक्ष्यार्थ स्पष्ट करा.
खालील कृती करा.

स्पष्ट करा.
सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे मोहित.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
इच्छेला शरीर असायलाच हवं का?
स्वमत.
तुमच्या मते शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते सकारण स्पष्ट करा.
स्वमत.
‘शालूवहिनीचे पुत्रप्रेम नैसर्गिक आहे’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते’ या विधानाची सत्यता पटवून द्या.
खालील कृती करा.

थोडक्यात स्पष्ट करा.
‘जीवनाच्या त्या प्रकाशात न्हाऊन आता मला सुंदर व्हायचं आहे!’, या दिदीच्या विधानाचा अर्थ.
थोडक्यात स्पष्ट करा.
महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष.
थोडक्यात स्पष्ट करा.
नाट्यउताऱ्यातील ‘डॉक्टर’ या पात्राची भूमिका.
स्वमत.
तुम्हांला समजलेली ‘ममी’ ही भूमिका नाट्यउताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.
स्वमत.
रंगसूचना कथानकातील दुवे कसे जोडतात ते स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.
अभिव्यक्ती.
नाट्यउताऱ्याद्वारे तुम्हांला समजलेला ‘सुंदर’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून पु. ल. देशपांडे यांच्या संवादलेखनाची वैशिष्ट्येलिहा.
