Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
(1) योग्य पर्याय निवडा: (2)
- तुमचे बाहू स्फुरण पावू दया -
- दुसऱ्याला मदत करण्यासाठी.
- समाजकार्य करण्यासाठी.
- देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी.
- देशातील लोकांना सामर्थ्यशाली बनवण्यासाठी.
- कवीच्या मते उत्सुकलेल्या हातांनी करावयाची गोष्ट -
- शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन दयावे.
- देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे.
- सत्कार्याला प्रोत्साहन द्यावे.
- हातांची उत्सुकता तशीच ठेवावी.
|
हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे॥धृ॥ |
(2) दिलेल्या पंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)
‘जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू दया, सदैव अपुली माणुसकीची नाती’
Advertisements
उत्तर
(1)
- देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी.
- देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे.
(2) या ओळींतून कवी भारतीय एकात्मतेचा संदेश देतात. कवी म्हणतात की, आपल्या भारत देशामध्ये विविध धर्माचे आणि अनेक जातींचे लोक राहत असले, तरी आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण प्रथम माणूस आहोत. आपल्यामध्ये कितीही वैविध्य असले, तरी आपल्यातील माणुसकीचे नाते हे कधीही न तुटणारे (अभंग) असायला हवे. आपण जात-धर्म विसरून मानवतेच्या नात्याने एकमेकांशी जोडलेले राहावे, असा उदात्त विचार कवीने येथे मांडला आहे.
