Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील तापमान-काल आलेख स्पष्ट करा.

Advertisements
उत्तर
बर्फ व पाणी यांच्या मिश्रणास सतत उष्णता दिल्यास काय : होते हे या तापमान-काल आलेखात दाखवले आहे.
या आलेखात रेख AB ही 0°C या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवतो. या वेळी बर्फ उष्णतेचे शोषण करतो. ही क्रिया बर्फाचे पूर्णपणे पाण्यात रूपांतर होईपर्यंत चालू राहते.
बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होईपर्यंत मिश्रणाचे तापमान 0°C असे स्थिर राहते. हे तापमान म्हणजे बर्फाचा वितळनांक होय. सर्व बर्फाचे पाणी झाल्यानंतर पाण्याचे तापमान 100°C पर्यंत वाढत जाते. या तापमानाला पाण्याचे रूपांतर वाफेत मोठ्या प्रमाणात होऊ लागते. सर्व पाण्याचे वाफेत रूपांतर होत असताना उष्णता ग्रहण केली जाते, पण तापमान स्थिर (100°C) राहते. हे तापमान म्हणजे पाण्याचा उत्कलनांक होय.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. याचे स्पष्टीकरण दवबिंदूच्या साहाय्याने करा.
हवा संपृक्त आहे की असंपृक्त आहे हे कशाच्या आधारे व कसे ठरवाल?
एका कॅलरीमापीचे वस्तुमान 100 g असून विशिष्ट उष्माधारकता 0.1 kcal/kg °C आहे. त्यामध्ये 250 g वस्तुमानाचा, 0.4 kcal/kg °C विशिष्ट उष्माधारकतेचा, व 30°C तापमानाचा द्रव पदार्थ आहे. त्यामध्ये जर 10 g वस्तुमानाचा, 0°C तापमानाचा बर्फाचा खडा टाकला तर मिश्रणाचे तापमान किती होईल?
हवेतील बाष्पाचे संघनन होऊन ______.
सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा जास्त : हवा दमट :: सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा कमी : ______.
दवबिंदू तापमान म्हणजे काय?
पहाटेच्या वेळी झाडाच्या पानांवर पाण्याचे थेंब जमा होतात हे कशाचे अस्तित्व दर्शवतात?
हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून नसते.
दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता 100% असते.
वातावरणाच्या खालील स्थितीत आपणास हवा कशी जाणवेल?
- जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल.
- जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल.
