Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
पोर्तुगिजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते.
टीपा लिहा
Advertisements
उत्तर
- पोर्तुगिजांनी एक प्रबळ आरमार स्थापन केले. किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा मुलुख ते उद्ध्वस्त करत असत. या आरमाराचा सामना करणे स्थानिक भारतीय सत्तांना शक्य झाले नाही. पुढे हिंदी महासागरावर पोर्तुगिजांनी वर्चस्व स्थापल्यावर भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायची असतील तर पोर्तुगिजांचे परवाने (कार्ताझ) घेणे आवश्यक झाले.
- पोर्तुगिजांचे आरमारी सामर्थ्य एवढेहोते की, मुघल, आदिलशाही व कुतुबशाही या सत्तांनासुद्धा कार्ताझ घेणे गरजेचे झाले. पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगालहून भारतात पाठवले जात.
- सतराव्या शतकात हिंदी महासागरात झालेल्या नाविक लढायांमध्ये डच व इंग्रजांनी पोर्तुगिजांचा पराभव केला.
- या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळल्यास इतर भारतीय सत्तांकडेस्वतःचे आरमार नव्हते.
shaalaa.com
भारत आणि युरोपीय वसाहतवाद - पोर्तुगीज
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
