मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा. ‘सेवा परमो धर्म:’ - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.

‘सेवा परमो धर्म:’

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

लेखिका कारगिल-द्वास येथून परतत असताना घडलेला प्रसंग आहे हा – रात्रीचे साडेदहा वाजले होते. मिट्ट काळोख पसरला होता. खल्सेचा पूल कोसळला होता. मागे-पुढे कुठेही जाण्याची सोय नव्हती. कर्नलना फोन लावला. विशेष म्हणजे ते फोनची वाटच पाहत होते. कर्नल लष्करी अधिकारी. कार्यव्यग्र. पण तशातही त्यांनी आठवण ठेवून लेखिकांसहित सर्व ३४ जणांची खाण्यापिण्याची व राहण्याची सोय केली. दुसऱ्या दिवशी सकाळी भेटण्याचे आश्वासन दिले. सेवावृत्ती असल्याशिवाय इतका प्रतिसाद मिळालाच नसता.

shaalaa.com
वीरांना सलामी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.05: वीरांना सलामी - कृती (१) [पृष्ठ २५]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 1.05 वीरांना सलामी
कृती (१) | Q 4.2 | पृष्ठ २५

संबंधित प्रश्‍न

कृती करा.


काव्यसौंदर्य.

कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्ये


काव्यसौंदर्य.

लेखिकेने सांगितलेली शहरी जीवनाची वैशिष्ट


काव्यसौंदर्य.

लेखिकेने वर्णन केलेली भारतीय जवानांची वैशिष्ट


चौकटीत उत्तरे लिहा.

तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक __________________


चौकटीत उत्तरे लिहा.

भयाण पर्वतांवर चढणार __________________


चौकटीत उत्तरे लिहा.

मृत्यूलाच आव्हान देणारी __________________


चौकटीत उत्तरे लिहा.

कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी __________________


चौकटीत उत्तरे लिहा.

चोवीस जणांची लडाख भेट __________________


कारणे लिहा.

थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ‘ऑपरेशन विजय’च्या स्मारकाला सलाम केला, कारण...


कारणे लिहा.

‘मिशन लडाख’ साठी ‘राखी पौर्णिमे’चा मुहूर्तनिवडला, कारण...


कारणे लिहा.

लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ॠणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं, कारण...


कारणे लिहा.

समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते, कारण...


पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.

एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता.


पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.

गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या.


पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.

लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात.


स्वमत.

‘जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो ।’ असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले आहे, ते स्पष्ट करा.


स्वमत.

‘आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.


अभिव्यक्ती.

कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकाच्या, ‘सिर्फ दिमाग में डाल देना है ।’ या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा.


खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) (२)

दृक-श्राव्य दालनातील कारगिल
युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे
(य) _________
(र) _________

(२) (२)

कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभा समोर
लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार
करावयाची कार्ये
(य) _________
(र) _________

 

मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंगं होती ती! ज्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, ह्याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला.

तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हांला कारगिल-युद्धाची फिल्म बघायला तेथील दृक-श्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ह्या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं, ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, “जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो!” चाबकानं शंभर फटके मारले असते, तर ज्या वेदना झाल्या असत्या; त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या. आणि त्या विव्हळ अवस्थेत विजयस्तंभासमोर शपथ घेतली -

“शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग ह्या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. केवळ शब्द नाहीत, तर तशी वृत्ती बनलेल्या सैन्यदलातील त्या वीरांचे भाट होऊन त्यांची कवनं गाईन आणि निदान पुढील पाच वर्ष नागरिकांना सोबत घेऊन ह्या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन.”

(३) स्वमत अभिव्यक्ति - (४)

शहीद वीराच्या आईचे शब्द ऐकून लेखिकेवर झालेला परिणाम तुमच्या शब्दांत लिहा.

किंवा

सैनिकी जीवन व सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दांत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×