मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

अभिव्यक्ती. निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परसंबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

अभिव्यक्ती.

निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परसंबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

मला कळू लागले तेव्हापासूनचे सर्व आठवते. कधीही फिरायला जाण्याची कल्पना आली, सहलीला जाण्याची वेळ आली की, मला प्रचंड आनंद होतो. खरे सांगायचे तर मला एकट्यालाच असे वाटते, असे नाही. आमच्या वर्गातल्या सर्व मित्रमैत्रिणींना सहलीचा विषय आला की, अमाप आनंद होतो. सहलीला गेलो, निसर्गात गेलो की, खूप आनंद मिळतो. नदीत डुंबायला मिळाले तर कितीही वेळ डुंबत राहावेसे वाटते. तेच रानावनात भटकतानाही वाटत असते. झाडांच्या सोबत वावरताना कंटाळा येतच नाही. हिरव्यागार वृक्षवेलींनी सजलेला डोंगर पाहताना मन सुखावते. हे असे का होत असावे?

वनस्पती या सजीव आहेत; त्यांना माणसांसारख्याच भावभावना असतात. वनस्पतींनाही आनंद होतो, दुःख होते. त्यांच्यावर प्रेमाने हात फिरवला, तर त्याही सुखावतात, हे सर्व आता लहानथोरांपासून सर्वांनाच ठाऊक झाले आहे. प्रत्येक ऋतूशी माणसाचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. म्हणूनच तर झाडे सुकून जाऊ लागली की माणसाचे मन कळवळते. वृक्ष नष्ट होऊ लागले की माणसाला दुःख होते. वृक्षतोड होताना दिसली की, माणसे खवळतात. शहरात माणसाला स्वत:चे वृक्षप्रेम जपता येत नाही, म्हणून माणसे कुंड्यांमध्ये रोपटी लावतात आणि त्यांचा आनंद घेतात. अमाप वृक्षतोड होऊ लागली, तेव्हा सुंदरलाल बहुगुणा या वृक्षप्रेमीने 'चिपको आंदोलन' उभारले. त्याला देशभर प्रचंड प्रतिसाद मिळाला.

लोकांच्या मनात हे एवढे वृक्षप्रेम दाटून आले, याचे कारणच हे की निसर्ग आणि आपण यांच्यात एक खोलवरचे नाते आहे. ज्या निसर्गाने माणसांना निर्माण केले, त्यानेच प्राण्यांना आणि वनस्पतींना निर्माण केले आहे. आपण सर्व निसर्गाची लेकरे आहोत. आपण, अन्य प्राणी आणि वनस्पती ही सर्व भावंडेच आहेत. आपणा सर्वांमध्ये हे असे रक्ताचेच नाते आहे. निसर्गच आपले पालनपोषण करतो. तोच अन्नपाणी देतो. तोच हवाही देतो. आपल्याला तोच जिवंत ठेवतो. आपल्या जगण्याचा आधारच निसर्ग हा आहे. हेच निसर्ग व मानव यांच्यातले नाते आहे.

shaalaa.com
रेशीमबंध
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.08: रेशीमबंध - कृती (६) [पृष्ठ ३९]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 2.08 रेशीमबंध
कृती (६) | Q 1 | पृष्ठ ३९

संबंधित प्रश्‍न

कृती करा.

उत्तररात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये


कृती करा.

घाणेरीच्या फुलांची वैशिष्ट्ये


कृती करा.

चाफ्याच्या फुलांची वैशिष्ट्ये


कृती करा.

उत्तररात्रीच्या वेळी खिडकीतून बाहेर पाहताना फुलांविषयी लेखकाच्या मनात निर्माण होणारे प्रशन


कारणे शोधा व लिहा.

पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो, कारण...


कारणे शोधा व लिहा.

मानवाला निसर्गाची ओढ लागते, कारण...


पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.

गुलमोहोर -


पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.

जॅक्रांडा -


पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.

चाफा -


वर्णन करा.

उत्तररात्रीचे आगमन


वर्णन करा.

पहाट व पाखरे यांच्यातील नात


खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.

वृक्ष-


खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.

फुले-


खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.

वेली-


खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.

पाखरे-


स्वमत.

‘मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे, ती या आदिम, ॠजु, स्नेहबंधांमुळे तर नाही?...’ या विधानासंबंधी तुमचे मत लिहा.


स्वमत.

‘रेशीमबंध’ या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.


अभिव्यक्ती.

डॉ. यू. म. पठाण यांच्या लेखनाची भाषिक वैशिष्ट्ये पाठाधारे स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना ‘सोयरी’ असे म्हटले आहे, यामागील तुम्हांला समजलेली कारणे लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×