Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृती पूर्ण करा.

Advertisements
उत्तर
'वीरांगना' या पाठात महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भावुक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा धाडसी, प्रेरक व थक्क करणारा जीवनप्रवास मांडला आहे.
स्वाती महाडिक यांनी शिवाजी विद्यापीठातून बी. एससी व एम. एस. डब्ल्यू हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्या पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी विविध योजना राबवण्याचे कार्य करत होत्या. लग्नानंतर त्यांनी बी. एड व इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. नंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली.
कर्नल संतोष महाडिक यांना अचानक वीरमरण आल्यानंतर पतीचे पहिले प्रेम असणाऱ्या भारतीय सैन्यदलात भरती होण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्याचवेळी पित्याचे छत्र हरवलेल्या आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा निर्धार त्यांनी केला.
ही देशप्रेमी वीरपत्नी धाडसी, निग्रही, करारी बाणा असणारी व जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारी आहे. खडतर आव्हाने पेलण्याची व आपण करत असलेल्या कामाविषयी अधिक जाणून घेण्याची कष्टाळू वृत्ती त्यांच्यात आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
‘कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
टिपा लिहा.
देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
हा पाठ (वीरांगना) वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्दबद्ध करा.
पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.

‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
टिपा लिहा.
देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
टिपा लिहा.
जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक
'प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश', पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
'मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा', या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.

टिपा लिहा.
मुले भरकटण्याची कारणे
टिपा लिहा.
रेखाजींच्या कार्याचा परिणाम
'भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत', हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
