हिंदी

आकृती पूर्ण करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृती पूर्ण करा.

सारिणी
Advertisements

उत्तर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य -

(१) परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला.
(२) मूक समाजाचे नेतृत्व केले.
(३) बहिष्कृत भारत जागा केला.
(४) चवदार तळ्याचा संग्राम केला.

shaalaa.com
तू झालास मूक समाजाचा नायक
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 19: तू झालास मूक समाजाचा नायक - कृती [पृष्ठ ८१]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 19 तू झालास मूक समाजाचा नायक
कृती | Q (१) (आ) | पृष्ठ ८१

संबंधित प्रश्न

आकृती पूर्ण करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ______ 


आकृती पूर्ण करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे - ______.


कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा. 

कवितेतील संदर्भ  स्पष्टीकरण
(१) मळवाट  (अ) अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज
(२) खाचखळगे  (आ) पारंपरिक वाट
(३) मूक समाज  (इ) अडचणी, कठीण परिस्थिती

चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षांत वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा.


चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा.

पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती  पन्नास वर्षांनंतरची परिस्थिती
____________ ____________
____________ ____________
____________ ____________

‘तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’, या ओळींचे रसग्रहण करा.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून (तू झालास मूक समाजाचा नायक) जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.


अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

तू झालास मूक समाजाचा नायक

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

तू झालास मूक समाजाचा नायक

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

'तू निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.'


पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

तू झालास मूक समाजाचा नायक

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेतील विषय. (१)
  3. दोन शब्दांचे अर्थ (२)
    अ) डचमळणे -
    ब) रणशिंग -

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायेत,
बिगूल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

1. चौकटी पूर्ण करा:  (2)

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ______
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे - ______

तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.

तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.

तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.

तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश; डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.

2. आकृतिबंध पूर्ण करा:  (2)

3. खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा:  (2)

तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास

4. काव्यसौंदर्यः  (2)

‘आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.’

या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×