मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. १) कारण लिहा. झाडावरून पिकलेली पाने गळून पडू लागली... गवताच्या पात्याच्या स्वप्नांचा चुराडा होण्याचे कारण... - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) कारण लिहा.  (२)

  1. झाडावरून पिकलेली पाने गळून पडू लागली...
  2. गवताच्या पात्याच्या स्वप्नांचा चुराडा होण्याचे कारण...

हिवाळा नुकताच सुरू झालेला होता.
झाडावरून एकामागोमाग एक पिकलेली पाने गळून पडू लागली.
पट... पट...पट...
त्यांचा तो पट...पट... असा कर्णकटू आवाज...
     तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले.
    ’पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की!“
    पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, ’अरे जा! चिडखोर बिब्बा कुठला! मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही, बेटा! हे गाणं चाललंय! जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही!“ हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले.
    ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने! त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला.

२) दिलेल्या घटना कालानुक्रमे लावा. (ओघतक्ता तयार करा.) (२)

विधाने-

अ) पान धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले.

ब) गवताच्या पात्याच्या गोड स्वप्नांचा चुराडा झाला.

क) हिवाळा सुरू झाला होता.

ड) चिमणे गवताचे पाते जागे झाले.

३) स्वमत-  (३)

रूपक कथेची वैशिष्ट्ये प्रस्तुत रूपककथेद्वारे स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

१)

  1. झाडावरून पिकलेली पाने गळून पडू लागली कारण हिवाळा सुरू झाला होता.
  2. गवताच्या पात्याच्या स्वप्नांचा चुराडा होण्याचे कारण झाडावरून खाली पडताना पानाने केलेला आवाज त्याला दंग्यासारखा वाटला.

२) 

हिवाळा सुरू झाला होता.
चिमणे गवताचे पाते जागे झाले.
गवताच्या पात्याच्या गोड स्वप्नांचा चुराडा झाला.
पान धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले.

३) 'गवताचे पाते' या रूपक कथेतील गवत व पिकलेली पाने या नैसर्गिक रूपकांच्या माध्यमातून लेखक वि.स.खांडेकर यांनी समाजातील तरुण व वृद्ध व्यक्तींच्या स्वभावातील पैलूंचे दर्शन घडवले आहे.
चिमुकले गवत हे तारुण्याचे प्रतीक आहे. त्याला पिकलेल्या पानाचा उपदेश सहन होत नाही, त्याला तरुणांप्रमाणेच स्वत:च्या स्वप्नात दंग राहणे आवडते. पिकलेली पाने ही वृद्ध व्यक्तींचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना स्वत:च्या मोठेपणाचा, उच्चपणाचा अभिमान आहे. त्यामुळे, ते गवताच्या चिमुकल्या पात्याला क्षुद्र समजतात. स्वत:चाच मोठेपणा मिरवतात. वडीलधाऱ्या मंडळींना तरुणांना उपदेश करणे आवडते. तरुणांना मात्र वडील पिढीचे सांगणे आवडत नाही. तरुण व्यक्ती वडीलधाऱ्या व्यक्तींच्या स्थितीचा विचार करत नाहीत. तसेच, वडीलधाऱ्या व्यक्ती आपले तरुणपणाचे दिवस लक्षात न घेता तरुणांवर टीका करतात. अशाप्रकारे, या दोन्ही रूपकांतून दोन पिढ्यांच्या मनोवृत्ती व त्यांच्या विचारांमधले अंतर दिसून येते.

shaalaa.com
गवताचे पाते
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: गवताचे पाते - कृती क्रमांक १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
पाठ 7 गवताचे पाते
कृती क्रमांक १ | Q 1. (अ)

संबंधित प्रश्‍न

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


कारणे लिहा.

झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली, कारण ______ 


कारणे लिहा.

‘अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही’ असे गळून पडणारे पान म्हणाले, कारण ______


कारणे लिहा.

वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पाण्यात झाले, कारण ______ 


‘माणसातील ठरावीक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते’, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.


गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता, तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते?


गवताचे पाते व पान यांच्या स्वभाववैशिष्ट्यांत बदल झाला आहे, अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) आकृतिबंध पूर्ण करा. (२)

       पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, ’अरे जा! चिडखोर बिब्बा कुठला! मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही, बेटा! हे गाणं चाललंय! जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही!“ हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले.
       ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने! त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले-झोपू लागले. पण पुन:पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती... पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती!
       ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वत:शीच पुटपुटले, 'काय ही हिवाळ्यातली पानं! जीव खाऊन टाकला यांनी अगदी! केवढा हा कर्णकटू आवाज... छी छी छी! माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी!'

२) परिणाम लिहा.  (२)

  1. वसंताच्या संजीवक स्पर्शाने गळून पडलेल्या पानाला स्पर्श केला. 
  2. हिवाळा सुरू झाल्याचा परिणाम...

३) स्वमत कृती -  (३)

कथेत दिसून येणारे मानवी गुणधर्म स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×