Advertisements
Advertisements
प्रश्न
‘माणसातील ठरावीक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते’, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे. आपल्या मुलाने सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा. त्याने चांगल्या मुलांचीच संगत धरावी. परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत... वगैरे वगैरे, असे प्रत्येक आईबाबांना वाटते. पण या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी असे काहीही केलेले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी धरलेले असले आग्रह यांनी उधळून लावले होते. मात्र हे आजच, आधुनिक काळातच, घडते असे नाही. जगभर सर्व मानवी समाजांत हेच घडत आलेले आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासूनच चालू आहे. प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो. तिथून जग जसे दिसते, तसे आणि तेवढेच खरे आहे, असे तो मानतो. म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

कारणे लिहा.
झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली, कारण ______
कारणे लिहा.
‘अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही’ असे गळून पडणारे पान म्हणाले, कारण ______
कारणे लिहा.
वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पाण्यात झाले, कारण ______
गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता, तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते?
गवताचे पाते व पान यांच्या स्वभाववैशिष्ट्यांत बदल झाला आहे, अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) कारण लिहा. (२)
- झाडावरून पिकलेली पाने गळून पडू लागली...
- गवताच्या पात्याच्या स्वप्नांचा चुराडा होण्याचे कारण...
|
हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. |
२) दिलेल्या घटना कालानुक्रमे लावा. (ओघतक्ता तयार करा.) (२)
विधाने-
अ) पान धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले.
ब) गवताच्या पात्याच्या गोड स्वप्नांचा चुराडा झाला.
क) हिवाळा सुरू झाला होता.
ड) चिमणे गवताचे पाते जागे झाले.
३) स्वमत- (३)
रूपक कथेची वैशिष्ट्ये प्रस्तुत रूपककथेद्वारे स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृतिबंध पूर्ण करा. (२)

| पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, ’अरे जा! चिडखोर बिब्बा कुठला! मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही, बेटा! हे गाणं चाललंय! जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही!“ हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने! त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले-झोपू लागले. पण पुन:पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती... पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती! ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वत:शीच पुटपुटले, 'काय ही हिवाळ्यातली पानं! जीव खाऊन टाकला यांनी अगदी! केवढा हा कर्णकटू आवाज... छी छी छी! माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी!' |
२) परिणाम लिहा. (२)
- वसंताच्या संजीवक स्पर्शाने गळून पडलेल्या पानाला स्पर्श केला.
- हिवाळा सुरू झाल्याचा परिणाम...
३) स्वमत कृती - (३)
कथेत दिसून येणारे मानवी गुणधर्म स्पष्ट करा.
