मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

तुमचे मत नोंदवा. भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमचे मत नोंदवा.

भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे.

सविस्तर उत्तर
Advertisements

उत्तर १

  1. भारतीय अवकाश संशोधन संस्थेची ‘इस्रो’ स्थापना करून भारताने अवकाश संशोधनात मोठी झेप घेतली; ‘आर्यभट्ट’ या पहिल्या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात सोडले.
  2. सुरुवातीला अन्य देशांच्या सहकार्याने उपग्रह पाठवणारा भारत आता अवकाश तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण झाला असून, पूर्णपणे भारतीय बनावटीचे उपग्रह आणि प्रक्षेपक आता अवकाशात पाठवले जात आहेत.
  3. भारताने व्यावसायिक धोरण स्वीकारून जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवले आहे आणि अन्य देशांचे उपग्रह वाजवी दरात अवकाशात सोडण्याचे कार्य यशस्वीपणे पार पाडले आहे.
  4. २००८ मध्ये प्रक्षेपित केलेल्या ‘चांद्रयान-१’ या मोहिमेद्वारे भारताने चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचे महत्त्वपूर्ण पुरावे शोधून काढले.
  5. भारताने ‘मंगळयान’ आणि ‘चांद्रयान-२’ हे उपग्रह अवकाशात सोडले.
  6. आता भारताने स्वबळावर अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची ‘गगनयान’ ही महत्त्वाची योजना तयार केली आहे.

अशा रितीने भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश झाला आहे, याबाबत शंकाच नाही.

shaalaa.com

उत्तर २

  1. २००७ मध्ये भारताने अवकाश संशोधनातील एका नव्या क्षेत्रात पदार्पण केले. इटलीचा उपग्रह भारताने व्यापारी तत्त्वावर अंतराळात सोडला.
  2. हे काम मिळवण्यासाठी अन्य देशांनी चढ्या दराने किंमत आकारली होती. भारताने वाजवी किंमत आकारून हे काम केले.
  3. व्यापारी तत्त्वावर काम करण्यापूर्वी भारताने अर्जेंटिना, बेल्जियम, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि जर्मनी या देशांचे उपग्रह अंतराळात सोडले होते.
  4. २००८ मध्ये भारताने प्रक्षेपित केलेल्या ‘चांद्रयान-१’ या उपग्रहाद्वारे चंद्रावर पाण्याचे पुरावे सापडले.
  5. त्यानंतर ‘मंगळयान’ आणि ‘चांद्रयान-२’ हे उपग्रह सोडले. या सर्व यशांनी हे सिद्ध केले की, अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात भारत हा एक अग्रगण्य देश आहे.
  6. सन २०२३ मध्ये, भारताने ‘चंद्रयान-३’ यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. त्यामुळे, अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात भारत हा एक अग्रगण्य देश आहे.
shaalaa.com
विज्ञान आणि तंत्रज्ञान
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: बदलता भारत - भाग १ - स्वाध्याय [पृष्ठ ८९]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 11 बदलता भारत - भाग १
स्वाध्याय | Q ५ | पृष्ठ ८९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×