Advertisements
Advertisements
प्रश्न
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
Advertisements
उत्तर
वार्षिक परीक्षेच्या अभ्यासातून मोकळे झाल्यावर मामाच्या गावाला जाण्याचा अनुभव मुलाला घेता आला. आगगाडीतून आणि बैलगाडीतून प्रवास करताना मुलाला खूप छान वाटले. गावातला निसर्ग, मामाच्या घरातली मायेची माणसे, त्यांचे प्रेम अनुभवता आले. पोहणे, झाडावर चढून आंबे, कैऱ्या तोडून खाणे, शेतात आमराईत फिरणे अशी धमाल करता करता नकळत दिवस मजेत निघून गेले, म्हणून 'सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.' असे मुलाला वाटले.
संबंधित प्रश्न
तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा.
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण कोणता?
असे का घडले? ते लिहा.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
सांगा पाहू.
| कधी हातावर, कधी भिंतीवर जाऊन मी बसतो, तीन हात माझे सतत फिरवत मी असतो, वेळ वाया घालवू नका असा नेहमी उपदेश करतो. |
सांगा पाहू.
| शिस्तीचे धडे उत्तम गडे, कणकण शोधते कधीच न रडे. |
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
विटीदांडू -
खालील तक्ता पूर्ण करा.
| लोखंडी वस्तू | काचेच्या वस्तू | लाकडी वस्तू | मातीच्या वस्तू |
जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?
अप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदा., बिरबल, तेनालीराम. यांच्या गोष्टी मिळवा. वाचा. वर्गात सांगा.
