Advertisements
Advertisements
प्रश्न
पैंजण’ या कवितेचे रसग्रहण करा.
Advertisements
उत्तर
आजी, आई, स्वतः व मुलगी या चार पिढ्यांतील स्त्री जीवनशैलीचे चित्रण व स्त्री-स्वातंत्र्याचा आलेख कवयित्री नीलम माणगावे यांनी 'पैंजण' या कवितेत शेव पांजळपणे अधोरेखित केला आहे. सामाजिक व कौटुंबिक जाचक बंधने हळूहळू झुगारून आजची स्त्री कोणत्या टप्प्यावर उभी आहे. तिला स्त्री-शक्तीची झालेली जाणीव ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. भूतकाळातील स्त्री सघषमय प्रवास करीत आजच्या शतकात सक्षम व मूल्यगर्भ आयुष्य जगत आत्मविकास करते आहे. ती आता अन्यायाच्या विरोधात स्वत:च उभी ठाकली आहे, हा बहुमोल संदेश ही कविता देते.
'पायातील पैंजण' हे प्रतीक कवयित्रींनी सामाजिक व कौटुंबिक जाचक बंधनांसाठी वापरले आहे व प्रत्येक काळात बदलत जाणारी पायातील अडसरांची रूपे प्रस्थापित केली आहेत आणि या प्रतीकांतन स्त्रीच्या स्वातंत्र्याचा प्रवास प्रत्ययकारी पद्धतीने मांडला आहे.
स्वयंपाकघर व माजघरापर्यंत मर्यादित असलेले व बंधनांनी केलेल्या जखमा सहन करणारे आजीचे आयुष्य. पैंजण नाकारले तरी तोरड्यांमुळे झालेल्या वेदना दुर्लक्षित करून अंगणापर्यंतचा प्रवास सुसहय करणारी आई. पिंजण व तोरड्या हद्दपार करून बाहेरच्या जगाशी संपर्क साधता येतो, म्हणून काही बंधनांच्या मर्यादेत राहणारी स्वतः कवयित्री आणि । स्वत:ला स्त्री-शक्तीची जाणीव झालेली व अन्यायाला पायदळी 'तुडवण्याची धमक असलेली कवयित्रींची मुलगी. स्त्रीच्या या वेगवेगळ्या कालखंडांतील चार रूपांतून आपल्याला स्त्री-जीवनाच्या खडतर प्रवासाची जीवघेणी कथा कळते.
मुक्तछंद प्रकारात लिहिलेली प्रस्तुत कविता तिच्या सहजसुंदर ओघवत्या शब्दकळेने विलक्षण परिणामकारक ठरली आहे. आक्रस्ताळेपणाने किंवा शब्दबंबाळ पद्धतीने स्त्रीच्या विद्रोह न मांडता स्त्री-वेदना मूकपणे किती बोलकी व प्रत्ययकारी होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून ही कविता अभिजात साहित्यात गणली जावी. स्त्री हक्क, स्त्री-स्वातंत्र्य व स्त्री-शक्ती या त्रिवेणी भावनांची वैचारिक वीण सशक्त व ठोस शब्दांत व्यक्त करणारी प्रस्तुत कविता, मला अंत:स्थ हृदयाला भावली आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अर्थ स्पष्ट करा.
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।
अर्थ स्पष्ट करा.
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।
चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलांचा इंद्रियांवर होणारा परिणाम _______
खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।३।।
खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
"तैसें शब्दांचे व्यापकपण। देखिजे असाधारण।
पाहातयां भावाज्ञां फावती गुण। चिंतामणीचे ॥२॥
ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
बिकट संकटांना कवीने म्हटले
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
चिडून सांडणारे ऊन म्हणजे
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
'मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला.'
सूचनेप्रमाणे सोडवा.
‘आश्रय’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
सूचनेप्रमाणे सोडवा. 'शब्दांनी मला खूप दिले; पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही किंबहना शब्दांच्या उपकाराची फेड करू शकत नाही', या अर्थाच्या ओळी शोधून लिहा.
मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य,' हे विधान स्पष्ट करा.
‘मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व’ तुमच्या शब्दांत लिहा.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
आजी जखमांना ऊब देऊन राज करायची! म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची! म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. म्हणजे-
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
पण सारे दुर्लक्षून राजराणीसारखे भिरभिरणे.
खालील तक्ता पूर्ण करा.
| व्यक्ती | घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र | ध्वनित होणारा अर्थ |
| माझी आजी | ||
| माझी आई | ||
| मी | ||
| माझी मुलगी |
‘चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते,’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा
आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे, ते स्पष्ट करा.
