Advertisements
Advertisements
प्रश्न
‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी’, या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
कवयित्री नीलम माणगावे यांनी 'पैंजण' या कवितेत 'पायातील दागिना' हे प्रतीक घेऊन चार पिढ्यांमधील स्त्रीची रूढीपरंपरेत होणारी घुसमट अत्यंत प्रांजळ व आवाहक भाषाशैलीत मांडली आहे. स्त्री-स्वातंत्र्याचा वैचारिक आलेख त्यांनी कवितेत साकारला आहे. कवयित्रींची आजी रूढींच्या घट्ट जोखडात जखडलेली होती. आई थोडीशी स्वतंत्र परंतु घराबाहेर पडण्यास तिला मज्जाव होता. कवयित्रींनी स्वत: घराबाहेरचे जग अनुभवले. जगात वावरण्याचे स्वातंत्र्य मिळावे, म्हणून काही बंधने तिने स्वीकारली. कवयित्रींची मुलगी मात्र स्वतंत्रपणे जगू इच्छिते. शिक्षणाने मिळालेली वैचारिक मूल्ये ती अंगिकारते. स्त्री स्वातंत्र्याचा खरा अर्थ तिला उमगला आहे. पायात जोखड घालून ती वावरत नाही. स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याची धमक तिच्यात आहे. तिला तिचे पाय घट्ट, मजबूत व पोलादी हवेत, ते जुलूम, अत्याचार, अन्याय यांना पायदळी तुडवण्यासाठी ! स्त्री-शक्तीची जाणीव होऊन ती स्वबळावर आपली लढाई लढणार आहे. नवनिर्मित मूल्यांचा पाठपुरावा करत ती या शतकाआधी समर्थ, सशक्त व सबळ होत आहे. म्हणून ती निर्धाराने आईला सांगते- अगं, पायाखालचे अडथळे मला मोडून टाकायचे आहेत. जुलमांचा दृढ प्रतिकार करण्याच्या स्त्री-शक्तीचे स्वतंत्र मूल्य या ओळींतून कवयित्रींनी ठामपणे प्रस्थापित केले आहे
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अर्थ स्पष्ट करा.
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।
‘मराठी भाषेची थोरवी’ तुमच्या शब्दांत लिहा.
ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
कृती करा.
कवीच्या जीवनातील 'शब्दांची भूमिका
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
बिकट संकटांना कवीने म्हटले
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
चिडून सांडणारे ऊन म्हणजे
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
‘दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.’
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
'मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला.'
सूचनेप्रमाणे सोडवा.
‘आश्रय’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
‘एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला....’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्वभाषेत लिहा.
मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत, ते लिहा.
'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य,' हे विधान स्पष्ट करा.
‘शब्द’ या कवितेचे रसग्रहण करा.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची! म्हणजे-
खालील तक्ता पूर्ण करा.
| व्यक्ती | घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र | ध्वनित होणारा अर्थ |
| माझी आजी | ||
| माझी आई | ||
| मी | ||
| माझी मुलगी |
खालील तक्ता पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेतील प्रतीक | कवितेचा रचनाप्रकार | कवितेची मध्यवर्ती कल्पना | कवितेची भाषाशैली |
‘चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते,’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा
आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे, ते स्पष्ट करा.
कवितेत वर्णन केलेली आजी व आजची आजी यांच्यात कालपरत्वे झालेला बदल स्वभाषेत स्पष्ट करा.
पैंजण’ या कवितेचे रसग्रहण करा.
