मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी विज्ञान (सामान्य) इयत्ता ११ वी

‘मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व’ तुमच्या शब्दांत लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व’ तुमच्या शब्दांत लिहा.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

इतिहास, भूगोल, भाषा व साहित्य यांतून संस्कृती जन्माला येते. संस्कृती जीवनधारणेची मूल्ये जोपासते. यांत भाषा म्हणजे शब्द यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
जन्माला आलेले मूल शब्द शिकत जाते व भाषेतून व्यक्तिमत्त्व संपन्न होते. म्हणून शब्द ही मानवजातीला लाभलेली अमूल्य देणगी आहे. शब्दांमधून माणूस आपले विचार, भावना व कल्पना मांडतो. शब्द हे विचारविनिमयाचे अनोखे साधन आहे. शब्द हा माणसाचा उबदार श्वास आहे. शब्दांनी जगातील वेगवेगळ्या संस्कृती एकमेकांशी जोडल्या आहेत. शब्दांतून माणुसकीचे जतन व संवर्धन होते. आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्याचे शब्द हे समर्थ साधन आहे. जनावरे व आपण यांतला भेद शब्दांमुळे कळतो. नराचा नारायण करण्याची अमोघ शक्ती शब्दांमध्ये आहे. साहित्य, शास्त्र, कला व विज्ञान यांचा मूलाधार शब्दच आहे. मानवी जीवनमूल्ये शब्दांमध्ये साठवलेली आहेत. शब्द हे एकाच वेळी शस्त्र व शास्त्रही आहे. परंपरा आणि नवता या शब्दांमधून पिढीला आकळतात. असा हा अनन्यसाधारण शब्द मानवी जीवनाचे 'जीवन आहे.

shaalaa.com
पद्य (Poetry) (11th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.1: शब्द - कृती [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
पाठ 2.1 शब्द
कृती | Q (५) (इ) | पृष्ठ ४६

संबंधित प्रश्‍न

अर्थ स्पष्ट करा.
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।


अर्थ स्पष्ट करा.
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।


चौकटी पूर्ण करा.
सर्व जगाला जागवणारा  _______


खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।३।।


‘मराठी भाषेची थोरवी’ तुमच्या शब्दांत लिहा.


ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
बिकट संकटांना कवीने म्हटले


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
शब्दांचा उजेड म्हणजे


खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
‘दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.’


खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
'मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला.'


सूचनेप्रमाणे सोडवा. 'शब्दांनी मला खूप दिले; पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही किंबहना शब्दांच्या उपकाराची फेड  करू शकत नाही', या अर्थाच्या ओळी शोधून लिहा.


‘एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला....’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्वभाषेत लिहा.


आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत, ते लिहा.


'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य,' हे विधान स्पष्ट करा.


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
आजी जखमांना ऊब देऊन राज करायची! म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. म्हणजे-


खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
पण सारे दुर्लक्षून राजराणीसारखे भिरभिरणे.


‘चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते,’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा


‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी’, या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे, ते स्पष्ट करा.


स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपांविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×