मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा: एक गरीब मुलगा – शाळेची फी भरण्यास पैसे नसणे – सकाळी पेपर टाकण्याचे काम – वाटेत पैशाचे पाकीट मिळणे – प्रामाणिकपणे पोलिस स्टेशनवर नेऊन देणे

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा:

एक गरीब मुलगा – शाळेची फी भरण्यास पैसे नसणे – सकाळी पेपर टाकण्याचे काम – वाटेत पैशाचे पाकीट मिळणे – प्रामाणिकपणे पोलिस स्टेशनवर नेऊन देणे – पाकिटाच्या मालकास आनंद – बक्षीस.

लेखन कौशल्य
Advertisements

उत्तर

प्रामाणिकपणाचे फळ

रामपूर नावाच्या एका गावात किशोर नावाचा एका मुलगा त्याच्या आईसोबत राहत होता. त्याची आई लोकांच्या शेतावर मोलमजुरीची कामे करत असे परंतु त्या कामातून किशोर आणि त्याच्या आईचा उदरनिर्वाह नीट होत नसे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे किशोरला शाळेची फी भरण्यासाठी ही पैसे नव्हते परंतु त्याला शिक्षणाची आवड होती व आपले शिक्षण अर्धवट राहू नये अशी त्याची मनापासून इच्छा होती. घरची आर्थिक परिस्थिती समजून घेतल्याने त्याला शाळेचा खर्च अशक्य वाटू लागल्यामुळे त्याने आपल्या आईला आर्थिक हातभार लावण्याचे ठरविले.

किशोर हा हुशार आणि प्रामाणिक मुलगा होता. घरच्या आर्थिक परिस्थितीची त्याला पूर्ण कल्पना होती व शाळा ही अर्धवट सोडायची नव्हती म्हणून तो शाळेच्या वेळेच्या आधी सकाळी लवकर उठून पेपर टाकण्याचे काम करू लागला. या कामामुळे मिळालेल्या पगारातून त्याला शाळेची फी भरण्यासाठी थोडी मदत होऊ लागली.

एके दिवशी किशोर असाच त्याचे पेपर वाटण्याचे काम करीत असतानाच वाटेत त्याला एक पैशाचे पाकीट पडलेले दिसले. ते पैशाचे पाकीट उचल्यावर ते खूप भरलेले आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याचवेळी तो एका क्षणाचाही विलंब न करता काही अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशन मध्ये जावून त्याने ते पैशाने भरलेले पाकीट तेथील पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी ते पाकीट तपासल्यावर त्यामध्ये त्याच्या मालकाचे ओळखपत्र सापडले व त्याला पोलिसांनी बोलावून घेतले आणि त्याचे पाकीट त्याच्या स्वाधीन केले.

आपले हरवलेले पाकीट पुन्हा सापडलेले बघून तो मनुष्य फारच आनंदी झाला. पोलिसांनी त्याला त्याचे हरवलेले पाकीट किशोरने कसे परत मिळवून दिले याची संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर त्या माणसाने किशोरच्या प्रामाणिकपणाचे खूप कौतुक करून त्याचे आभारही मानले व त्याचबरोबर त्याने किशोरला बक्षीस ही दिले.

किशोरला मिळालेले हे बक्षीस म्हणजेच त्याच्या प्रामाणिकपणाचे फळ होते. किशोरने केलेली ही कामगिरी ऐकल्यावर त्याची आई आणि शाळेतील शिक्षक ही खूप आनंदी झाले.

तात्पर्य: प्रामाणिकपणा ही माणसाची खरी संपत्ती आहे: कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिकपणा टिकवणं महत्त्वाचं आहे.

shaalaa.com
कथालेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा.

मैत्री  → दप्तर  → गृहपाठ  → रस्ता

खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

लक्ष्मण नावाचा तरुण----कैदेत----गावप्रमुखाचे कैदखान्याचे निरीक्षण करणे----लक्ष्मणची सुटकेसाठीची विनंती----सुटका व आर्थिक मदत----लक्ष्मण पक्षी घेऊन बाजारात----सर्व पक्षी पिंजऱ्यासहित विकत घेणे----पक्षी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह----पक्ष्यांची पिंजऱ्यातून मुक्तता----मुक्ततेचा आनंद----बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

जंगलातील वृक्ष ______ चिमणीचे जोडपे ______ गुण्यागोविंदाने राहाणे ______ हत्तीचा धुमाकूळ पिले मारणे ______ चिमणा-चिमणीचा आक्रोश ______ सुतार पक्ष्याचा सल्ला व प्रेरणा ______ हत्तीची समजूत ______ बोध.


खालील कथालेखन करा.

महेंद्र नावाचा विद्यार्थी ______ हलाखीची परिस्थिती ______ रानात रोपट्यांचा शेंडा तुटलेला पाहाणे ______ मनात विचार ______ आत्मज्योत जागृत होणे ______ प्रयत्नांची पराकाष्ठा ______ यशस्विता ______ लेखक म्हणून प्रसिद्धी.


खालील कथालेखन करा.

रोहिणी नावाची मुलगी ______ कुटुंबात तिघी बहिणी ______ परिस्थिती सर्वसाधारण ______ रोहिणी हुशार ______ तिघींची जिद्द ______ शिक्षणाबरोबर शेतीकाम ______ मोठे स्वप्न ______ स्वप्न साकार _____ त्यांची पोलीस अधीक्षक, शिक्षिका व सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती.


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

आदिवासी समाजात असणाऱ्या राजू नावाच्या मुलाला शिक्षणाची आवड असल्याने तो रानावनात झाडांच्या खोडांवर जमिनीवर अक्षरे गिरवायला शिकला. त्याची ती शिक्षणाची ओढ पाहून आई-वडिलांना आश्चर्य वाटत असे. असेच एकदा क्षेत्रभेटीसाठी सुहास नावाचे गुरुजी विद्यार्थ्यांना घेऊन त्या भागात आले. त्यांनी राजूची अभिलाषा ओळखली आणि त्याच्या आई-वडिलांची परवानगी घेऊन राजूला आपल्या शाळेत दाखल केले आणि...


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

नंदुरबारच्या खर्डी या आदिवासी गावात रिंकी नावाची मुलगी दगड-मातीतून धावायची. सात भावंडांमध्ये पाचव्या नंबरची मुलगी होती. घरी कोरडवाहू शेती होती. त्यामुळे, तिच्या आई-वडिलांना इतरांच्या शेतात काम करणे व उन्हाळयाच्या दिवसात मजुरीसाठी गावाबाहेर पडावे लागायचे. सर्व भावंडे मात्र घरीच असायची. यातच मोठ्या भावाला पळण्याचे वेड असल्याने तो पळण्यात तरबेज झाला. पुढे जाऊन त्याने स्पर्धेत भाग घेतला. या धावण्याच्या वेडामुळेच पुढे जाऊन त्याला वनरक्षक होण्याचं भाग्य लाभलं. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन रिंकीसुद्धा धावू लागली आणि...


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

एकीचे बळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

प्रामाणिकपणाचे फळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

पळसाला पाने तीनच


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

अति तिथं माती


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे


खालील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा.

मुद्दे: शाळेत जाणारा कष्टाळू – प्रामाणिक मुलगा – वाईट मित्रांची संगत – शिक्षकांना काळजी – मुलाला घेऊन बाजारात फेरफटका – उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी – एक खराब झालेला आंबा – दोन दिवसांनी पाहणी – नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब – संदेश –


खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

आटपाट नगर - वृद्ध शेतकरी - आंब्याची रोपे - बागेत काम - राजा हिंडत बागेत - राजाची चौकशी - रोपे लावून फळे केव्हा - शेतकऱ्याचे उत्तर ऐकून राजाला आश्चर्य - शेतकऱ्याला बक्षीस.


खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा.

हट्टी राजकन्या त्याला अर्धे राज्य मिळते
`↓` `↑`
राज्यकन्येची अट शेतकऱ्याचा मुलगा येतो
`↓` `↑`
न संपणारी गोष्ट सांगणे बरेच जण प्रयत्न करतात
`↓` `↑`
राज्यात दवंडी अर्धे राज्य

खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

मुद्दे: अनाथ मुलगा – रोज सकाळी वर्तमानपत्राचे वाटप – दुपारी शाळेत – रस्त्यात एक पाकीट मिळते – वर्गशिक्षकांकडे देणे – पाकिटावरील पत्यावरून योग्य व्यक्तिपर्यंत पोहोचवणे – मालकाला आनंद – शाबासकी – मुलाला बक्षीस व त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×