Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
'तू निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.'
Advertisements
उत्तर
कवी ज. वि. पवार यांनी महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव म्हणून ही कविता लिहिली आहे. रूढ धार्मिक व सामाजिक बंधनांना झुगारणाऱ्या, नव्या समाजाचा पाया उभारणाऱ्या बाबासाहेबांना या कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत समाजाच्या उन्नतीचे कार्य जेव्हा हाती घेतले, तेव्हा समाजात अज्ञानाचा काळोख पसरलेला होता. या काळोख्या साम्रज्यात ज्ञानाचा प्रकाश आणण्यासाठी, समाजाला जागृत करण्यासाठी एखाद्या मार्गदर्शकाची गरज होती. बाबासाहेब तो मार्गदर्शक बनले. त्यांनी पारंपरिक वाट नाकारली. नव्या समाजाची जडणघडण करण्याकरता, बहिष्कृतांना आत्मसन्मान मिळवून देण्याकरता त्यांनी नवी वाट शोधली. त्या वाटेवर त्यांना असंख्य अडचणी, कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला. हाती घेतलेल्या कार्याची सुरुवात करताना त्यांनी रूढ, सामाजिक परंपरांविरुद्ध बंड केले. नवा मार्ग स्वीकारला. तेथे त्यांचे स्वागत खाचखळग्यांनी म्हणजेच, अनंत अडीअडचणींनी केले असा आशय वरील काव्यपंक्तींतून व्यक्त होतो.
प्रस्तुत ओळींतून वाचकास वीररसाचा प्रत्यय येतो. काळोख, सूर्यफुले, मळवाट इत्यादी प्रतीकांचा मोठ्या खुबीने वापर करून कवीने कवितेला एक आगळे परिमाण दिले आहे. अशा आशयघन शब्दरचनेतून बाबासाहेबांच्या संघर्षाची तीव्रता व महानता वाचकांपर्यंत पोहोचते. या समाजप्रबोधनपर कवितेची रचना मुक्तछंदातील आहे. मुक्तछंदामुळे कवितेतील कवीचे मनोगत थेट रसिक वाचकापर्यंत पोहोचते. कवीने संवादपर शैलीत भाष्य केल्यामुळे जणू काही कवी डॉ. आंबेडकरांशी बोलत असल्याचा भास निर्माण होतो. या संवादशैलीमुळे कवितेच्या साैंदर्यात भर घातली गेली आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ______
आकृती पूर्ण करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे - ______.
आकृती पूर्ण करा.

चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षांत वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा.
‘तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’, या ओळींचे रसग्रहण करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून (तू झालास मूक समाजाचा नायक) जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.
अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
तू झालास मूक समाजाचा नायक
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृत्या पूर्ण करा. (२)
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ___________
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करणारे - ___________
2. सत्य विधान ओळखा. (२)
- बाबासाहेब निघाले तेव्हा सूर्यफुलांनी त्यांचे स्वागत केले.
- बाबासाहेब बोलक्या जिवांचे नायक झाले.
- चवदार तळ्यावर बाबासाहेबांनी गुलामांच्या पायात बेड्या चढवल्या.
- विषम परिस्थितीवर स्वार होत बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला.
|
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू झालास परिस्थितीवर स्वार तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर तुझे शब्द जसे की आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय |
3. ओळींचा सरळ अर्थ लिहा. (२)
'तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत' या ओळींचा सरळ अर्थ लिहा.
4. विचार साैंदर्य लिहा. (२)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
तू झालास मूक समाजाचा नायक
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
तू झालास मूक समाजाचा नायक
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेतील विषय. (१)
- दोन शब्दांचे अर्थ (२)
अ) डचमळणे -
ब) रणशिंग -
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायेत,
बिगूल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय.
