Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
‘प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे’, तुमचे मत लिहा.
Advertisements
उत्तर
प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे आवश्यक आहे; हे अगदी खरे आहे. आपण हे भान बाळगत नाही. त्यामुळे आपले नुकसानही होते. आपल्या साध्या साध्या कृतींकडे लक्ष दिले, तरी हा मुद्दा लक्षात येईल. रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या गाड्यांना आपण लीलया चुकवत चुकवत जातो. खो-खोमध्ये किती चपळाई दाखवतो आपण! आपण सवयीने या हालचाली करतो. त्यामुळे त्यांतली किमया आपल्या लक्षातच येत नाही. 'चक दे इंडिया हा चित्रपट पाहताना है खूपदा लक्षात आले आहे. सर्व हालचाली करताना आपण आपल्या शरीराचा उपयोग करतो. 'हे माझे शरीर आहे आणि या शरीराच्या आधाराने मी जगतो,' ही भावना सतत जागी असली पाहिजे. मग आपल्या प्रत्येक हालचालीचा आपण बारकाईने विचार करू शकतो. शरीराला प्रशिक्षण देऊ शकतो. अनेकदा आपल्याला नाचण्याची लहर येते. पण पावले नीट पडत नाहीत. आपण मनातल्या मनात खटू होतो. पण शरीराची जाणीव असेल, तर नृत्यातल्या हालचाली शिकून घेता येतात. तिथेच आपली चूक होते.
खरे तर प्रत्येक पाऊल टाकताना आपण आपल्या शरीराचा डौल राखला पाहिजे. कोणाही समोर जातो, तेव्हा हेच लक्षात ठेवले पाहिजे. आपण इतरांसमोर स्वत:ला सादर करीत असतो. ते सादरीकरण सुंदर केले पाहिजे. आपल्याला लाभलेले अस्तित्व प्रत्येक क्षणाला साजरे केले पाहिजे. तर मग आपण जगण्याचा आनंद घेऊ शकतो. अभिनेते, खेळाडू अनेक कसलेले सादरकर्ते डौलदार का दिसतात? एखादी अभिनेत्री फोटोसाठी उभी राहते, तेव्हा तीच लक्षणीय का दिसते? ही सगळी माणसे आपल्या देहाचे, आपल्या अस्तित्वाचे भान बाळगतात. आपले अस्तित्व देखणे करायचा प्रयत्न करतात. ती स्वत:च्या अस्तित्वाचा आनंद घेतात आणि दुसऱ्यांना देतातही. हेच सुख असते. त्यातच आनंद असतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृती करा.
लेखकाने वर्णिलेली खऱ्या आनंदाची लक्षणे
कृती करा.
माणसाच्या एकटेपणातून निर्माण होणारे आविष्कार
यश, वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्तं आहेत.
पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो.
शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो.
यशामुळे आत्मविश्वास वाढतो.
खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.
ज्यात तुम्हांला खरा आनंद वाटतो, तेच काम करा.
हे केव्हा घडेल ते लिहा.
माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो, जेव्हा...
हे केव्हा घडेल ते लिहा.
माणूस दु:खातून बाहेर पडत नाही, जेव्हा...
हे केव्हा घडेल ते लिहा.
आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा...
हे केव्हा घडेल ते लिहा.
एका वेगळ्या विश्वात वावरता येतं, जेव्हा...
खालील चौकटी पूर्ण करा.
आनंदाला आकर्षित करणारा - ......
खालील चौकटी पूर्ण करा.
शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू- ____________
खालील चौकटी पूर्ण करा.
बाहेर दाराशी घुटमळणारा- ____________
खालील चौकटी पूर्ण करा.
आनंदाला प्रसवणारा- ____________
खालील चौकटी पूर्ण करा.
आनंद अनुभवण्याची निमित्तं- ______ ______
स्वमत.
‘सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
खरा, टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
अभिव्यक्ती.
तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल, ते लिहा.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गंमती - (२)
(य) ______
(र) ______
(२) (य) आनंदाविषयी उताऱ्यात आलेली काव्यपंक्ती - (१)
(र) प्रस्तुत काव्यपंक्तीविषयी लेखकाने व्यक्त केलेले मत - (१)
|
आनंद सगळ्यांनाच हवा असतो... पण आपला आनंद नेमका कशात आहे, हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद? कुठे नसतो हा आनंद? आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे! ही फक्त कविकल्पनाच नव्हे, तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे! आनंदाची गंमत अशी आहे, की तुम्ही शोधू लागलात, की तो दडून बसतो, पकडू गेलात, की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल, तितका तो हुलकावण्या देतो. जितका सहजपणे घ्याल, तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच. तो अनुभवता मात्र यावा लागतो. आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो. हे खरं आहे, की आनंद सर्वत्र असतो; पण अंतरंगात आनंद असेल, तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं, ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो, तो फक्त आनंदच. |
(३) स्वमत अभिव्यक्ती - (४)
‘आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
किंवा
‘आनंदाची तुमची संकल्पना’ तुमच्या शब्दांत लिहा.
