हिंदी

शिक्षण हे पवित्र आहे आणि त्याचे पावित्र्य राखण्याची नितांत गरज आहे, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची श्रद्धा आहे. शिक्षण हा एकूणच मानवी जीवनाचा पायाभूत संस्कार आहे आणि शाळा हे संस्कारकेंद्र आहे. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शिक्षण हे पवित्र आहे आणि त्याचे पावित्र्य राखण्याची नितांत गरज आहे, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची श्रद्धा आहे. शिक्षण हा एकूणच मानवी जीवनाचा पायाभूत संस्कार आहे आणि शाळा हे संस्कारकेंद्र आहे. थोर समाजचिंतकांनी 'विद्ये'ला, 'ज्ञाना'ला महत्त्व का दिले याचे इंगित हेच आहे. विद्या जीवनाला वळण देते, सुधारते. विद्येची वाढ होणे सार्वजनिक हितासाठी आवश्यक असल्याचे लोकहितवादींनी प्रतिपादिले होते. नव्या ज्ञानाचे दरवाजे उघडण्यासाठी प्राचीन व्यवस्थेची चिकित्सा करणे त्यांना आवश्यक वाटत होते. गोपाळ गणेश आगरकर नव्या ज्ञानक्षेत्रासाठी व्यक्तिजाणिवांना प्राधान्य देत होते, तर महात्मा जोतीराव फुले यांनी 'विद्येविना मती गेली' असे विद्येचे महत्त्व प्रतिपादून 'अविद्या हे सर्व अनर्थांचे मूळ आहे' असे सांगितले.

वरील अपठित उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

लेखन कौशल
Advertisements

उत्तर

शिक्षणाचे पावित्र्य जपण्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची श्रद्‌धा होती. शाळा हे संस्कारकेंद्र आहे. लोकहितवादींच्या मते सार्वजनिक हितासाठी विद्येची वाढ होणे व प्राचीन व्यवस्थेची चिकित्सा नव्या ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक आहे. गोपाळ गणेश आगरकर नव्या ज्ञानक्षेत्रासाठी व्यक्तिजाणिवा महत्त्वाच्या मानत. महात्मा फुलेंनी 'अविद्या' सर्व अनर्थांचे मूळ मानले.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×