हिंदी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा: बडोदा संस्थानातील सामाजिक सुधारणेत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे योगदान महत्त्वाचे आहे. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा:

बडोदा संस्थानातील सामाजिक सुधारणेत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

  1. बडोदा संस्थानात महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी पुरोगामी धोरण आखले होते.
  2. यांनी अस्पृश्य-आदिवासींना सरकारी खर्चाने शिक्षण आणि वसतिगृह उपलब्ध करून देण्याचा हुकुम काढला.
  3. स्त्री-शिक्षणास प्रोत्साहन आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा त्यांनी सुरू केली.
  4. महाराजांनी राजवाड्यात सर्व जातींचे एकत्र सहभोजन, गाव तेथे ग्रामपंचायत, ग्रामपंचायत सद्स्य किमान साक्षर पाहिजे, गाव तेथे वाचनालय, सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण, शालेय मुला-मुलींना शारीरिक शिक्षण सक्तीचे केले.
  5. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीपूरक कौशल्य विकासाधारित अभ्यासक्रम संस्थानात सुरू केले.
  6. बालविवाह बंदी, विधवा पुनर्विवाह, संस्थानात विधवा स्त्रीबरोबर मुलींना माहेरच्या मिळकतीत वाटा देण्याचा त्यांनी कायदा केला.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×