हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

या कवितेत आई, जी आपल्या मुलाला युद्धभूमीवर पाठवत आहे, ती एक सामान्य माता नसून एक वीरमाता आहे. ती आपल्या मुलाच्या रणांगणावरील प्रवासाचे स्वागत आनंदाने घराला तोरण बांधून करते. पंचप्राणांच्या ज्योतींनी ती बाळाचे औषक्षण करते, जे त्याच्या यशस्वी आणि सुरक्षित प्रवासासाठी आशीर्वाद देणारे कृत्य आहे.

ती बाळाला सांगते की देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी तुझ्या बळकट बाहूंची आहे. तुझ्या खांद्यावर भविष्यातील शांतता आणि सुखाची जबाबदारी आहे. ती म्हणते, तिच्या डोळ्यांत अश्रू किंवा गळ्यात हुंदके येणार नाहीत, कारण ती एक वीरमाता आहे, ती जिजाई आणि राणी लक्ष्मीबाईंच्या वीरत्वाची वारसदार आहे. मीच तुझ्या तलवारीला धार लावून ठेवली आहे. तुझ्यावर कोणत्याही संकटाची सावलीदेखील पडणार नाही.

ती त्याला शिवाजी महाराजांचे कर्तृत्व स्मरण करण्याचा सल्ला देते आणि भवानी मातेचा आशीर्वाद त्याला शक्ती प्रदान करेल, असे सांगते. विजयी होऊन परत आल्यानंतर, तिला आपल्या मातृत्वाचे सार्थकता जाणवेल. ती आपल्या मुलाला पुन्हा दूधभात खाऊ घालण्याची आतुरता व्यक्त करते. या कवितेमध्ये वीरमातेच्या बोलण्यातून तिची हिम्मत, ठाम निर्धार आणि अटूट माया ही भावना प्रतिबिंबित होते.

shaalaa.com
निरोप
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 15.1: निरोप - स्वाध्याय [पृष्ठ ६४]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 15.1 निरोप
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ ६४

संबंधित प्रश्न

कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण ______.


खालील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा.

अशुभाची साऊली


खालील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा.

पंचप्राणाच्या ज्योतींनी औक्षण


कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतील पात्रे कवितेत उल्लेख आलेल्या थोर व्यक्ती आईने व्यक्त केलेली इच्छा
       

‘तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना शक्ति देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी’, या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा.


‘धन्य करी माझी कूस, येई विजयी होऊन, पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन’, या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.


‘भारतभू ही वीरांची भूमी आहे’, याबाबत तुमचे मत लिहा.


सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×