हिंदी

कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

कवी नारायण सुर्वे यांच्या 'दोन दिवस' या कवितेत कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रित केले आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही या कष्टकऱ्याना रोज प्रचंड कष्ट करावे लागतात. हे कष्ट उपसण्याच्या नादात, त्या कामगाराला आपल्या सुंदर आयुष्याचा, आजूबाजूच्या सुंदर निसर्गाचा आस्वाद घ्यायला वेळच नसतो.त्याला रोजच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते. गरिबी कायम सोबतीला असते. त्याच्यातील नवनिर्मितीच्या क्षमतेची उपेक्षा होते. कष्टमय जीवनाला अश्रूंची सोबत असते. दु:ख पचवण्याचे, त्यावर मात करून पुढे जात राहण्याचे बळ गोळा करावे लागते.

झोतभट्टीतील पोलाद ज्याप्रमाणे तावून सुलाखून बाहेर पडते त्याप्रमाणे कामगारांचे आयुष्य नाना तऱ्हेच्या संकटांनी, दु:खांनी होरपळून निघत असते, तरीही हा कामगार नेहमी कष्ट करत राहतो. या दु:खांत होरपळल्यामुळे त्याचे सामर्थ्य जणू वाढीस लागते. दु:खांचा, परिस्थितीचा बाऊ न करता, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले आयुष्य पुढे जगतच राहतो. अशाप्रकारे, कष्टाशी, दु:खांशी झुंज देण्यात या कष्टकऱ्यांचे अवघे आयुष्य व्यतीत होते.

shaalaa.com
दोन दिवस
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: दोन दिवस - कृती [पृष्ठ १८]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 5 दोन दिवस
कृती | Q (४)(इ) | पृष्ठ १८

संबंधित प्रश्न

खालील ओळींचे रसग्रहण करा. 

दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.


कृती पूर्ण करा.

‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत’ या आशयाची कवितेतील ओळ शोधा.


कृती पूर्ण करा.

कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा.


एका शब्दांत उत्तर लिहा.

कवीचा जवळचा मित्र - ______


खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

माना उंचावलेले हात


खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

कलम केलेले हात


खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’


'दु:ख पेलावे आणि पुन्हा जगावे', या वाक्यामागील तुम्हांला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


'कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात - 


खाली कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)

1) आकृती पूर्ण करा. (०२)

१. चौकटी पूर्ण करा. (०१)

१. कवींनी पोलादाची उपमा कशाला दिली -

२. कवींची जिंदगी काय करण्यात बरबाद झाली -

२. आकृती पूर्ण करा. (०१)

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो

दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

2) कृती पूर्ण करा. (०२)

  1. 'अथक व अखंड कष्ट करूनही आयुष्यभर गरिबीतच राहावे लागले' या आशयाची कवितेतील ओळ शोधा.
  2. 'झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले' या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

3) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)

१. जग - 

२. जिंदगी -

३. मित्र -

४. दिवस -

4) खाली दिलेल्या ओळींचे आशय साैंदर्य स्पष्ट करा. (०२)

“दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले,

हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे”


खालील ओळींचे रसग्रहण करा.

दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो.
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.


खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.

मुद्दे ‘दोन दिवस’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘झोतभट्टीत शेकावे पोलाद। तसे आयुष्य छान शेकले।।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) वाळविले -
(ii) पेलावे - 
(iii) हरघडी - 
(iv) अगा -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘दोन दिवस’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -  
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -  
(3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. ‘हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले’
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. (i) जिंदगी -
(ii) बरबाद - 
(iii) हरघडी - 
(iv) दुनिया - 

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

1. एका शब्दात उत्तर लिहा.     (2)

  1. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट -
  2. कवीचा जवळचा मित्र -

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो.
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

2. कृती पूर्ण करा.      (2)

  1. कवीचा प्रयत्नवाद व आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
  2. 'दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात', या शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

3. पुढील शब्दांचा अर्थ लिहा.      (2)

  शब्द अर्थ
1. दारिद्र्य ______
2. हरघडी ______
3. साहाय्य ______
4. दुनिया ______

4. 'कवितेत व्यक्‍त झालेले जीवनसत्य', याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.  (2)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×