Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा:
भारतातील प्रशासकीय सुधारणा बाबत तुमचे मत नोंदवा.
लघु उत्तरीय
Advertisements
उत्तर
भारतात प्रशासकीय सुधारणांची नितांत आवश्यकता असून, त्या बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगांनी या बाबीवर विशेष भर दिला होता. भारतीय प्रशासनातील मुख्य दोष म्हणजे लालफीतशाही, पारदर्शकतेचा अभाव, अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार हे होत. अलीकडच्या काळात प्रशासकीय क्षेत्रात अनेक सुधारणा अंमलात आणल्या गेल्या आहेत. यातील सर्वात उल्लेखनीय प्रशासकीय बदल म्हणजे ‘नागरिक सनद’ (Citizens’ Charter), ‘माहितीचा अधिकार’ आणि ‘लोकपाल-लोकायुक्त’ हे होत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
