हिंदी

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची।

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।
विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची।

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

'उत्तमलक्षण' या श्रीदासबोधातील उपदेशपर रचनेतून संत रामदासानी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. तिने कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचा खुलासा यातून केला आहे.

माणसाने नेहमी स्वत:च्या प्रतिमेस जपावे. स्वत:ची अपकीर्ती पसरेल असे वर्तन कधीही करू नये. नेहमी चांगले कर्म करून स्वत:ची कीर्ती वाढवावी. अशाप्रकारे, माणसाने आपल्या योग्य वर्तनातून स्वत:चा उत्कर्ष साधावा, असा आशय प्रस्तुत काव्यपंक्तींतून व्यक्त होतो.

प्रस्तुत रचना संतकाव्य आहे. हे उपदेशपर काव्य आहे. यातून शांतरसाचा अनुभव मिळतो. प्रस्तुत काव्यपंक्तींत विरुद्धार्थी शब्दांची योजना केलेली आहे. त्यामुळे, काव्यसाैंदर्यात भर पडली आहे. उदा. अपकीर्ति - सत्कीर्ति. ही साडेतीन चरणांची ओवी आहे. पहिल्या तीन चरणांमध्ये 'वी' या अक्षराची पुनरावृत्ती होऊन कविता नादमय झाली आहे. 'व' या अक्षराच्या पुनरावृत्तीने अनुप्रास अलंकार साधला आहे. रामदासकालीन मराठी भाषेचा गोडवा व आंतरिक लय यांमुळे ही रचना वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे.

shaalaa.com
उत्तमलक्षण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: उत्तमलक्षण - कृती क्रमांक १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 उत्तमलक्षण
कृती क्रमांक १ | Q 2. (इ)

संबंधित प्रश्न

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.

तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा.


खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.

तोंडाळ


खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.

संत


खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.

गोष्टी दक्षता
(१) आळस ______
(२) परपीडा ______
(३) सत्यमार्ग ______

खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा.

‘जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये।
 पुण्यमार्ग सोडूं नये। कदाकाळीं।।’


‘सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।’, या ओळीतील विचार स्पष्ट करा.


‘आळसें सुख मानूं नये’, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

उत्तमलक्षण

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) कोष्टक पूर्ण करा.  (२)

श्रोतीं व्हावें सावधान। आतां सांगतों उत्तम गुण।
जेणें करितां बाणे खुण। सर्वज्ञपणाची।।१।।

वाट पुसल्याविण जाऊं नये। फळ ओळखिल्याविण खाऊं नये।
पडिली वस्तु घेंऊ नये। येकायेकीं।।२।।

जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये।
पुण्यमार्ग सोडूं नये। कदाकाळीं।।३।।

तोंडाळासीं भांडों नये। वाचाळासीं तंडों नये।
संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं।।४।।

आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये।
शोधिल्याविण करूं नये। कार्य कांही।।५।।

सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।
पैज होड घालूं नये। कांहीं केल्या।।६।।

कोणाचा उपकार घेऊं नये। घेतला तरी राखों नये।
परपीडा करूं नये। विश्वासघात।।७।।

व्यापकपण सांडूं नये। पराधेन होऊं नये।
आपलें वोझें घालूं नये। कोणीयेकासी।।८।।

सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये।
कदा अभिमान घेऊं नये। असत्याचा।।९।।

अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।
विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची।।१०।।

२) खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.  (२)

क्र. गोष्टी उत्तर दक्षता
i. आळस ______ मानू नये.
ii. परपीडा ______ वागू नये.
iii. सत्यमार्ग ______ नये.
iv. सभेतील वर्तन ______ नये.

३) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा.  (२)

सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये।
कदा अभिमान घेऊं नये। असत्याचा।

४) खालील काव्यपंक्तींतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा.  (२)

तोंडाळासी भांडो नये। वाचाळासीं तंडों नये।
संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं।


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

उत्तमलक्षण

  1. प्रस्तुत कवितेच्या कवीचे/ कवयित्रीचे नाव लिहा.  (१)
  2. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश.  (१)
  3. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×