Advertisements
Advertisements
प्रश्न
चित्र पाहा. संवाद वाचा.

| नीता: | आजी हे बघ, नदीतलं पाणी दिसतच नाही. |
| आजी: | हो, नदीत जलपर्णी उगवली आहे. |
| नीता: | जलपर्णी म्हणजे काय गं आजी? |
| आजी: | पाण्यात उगवणारी वनस्पती. |
| नीता: | ती पाण्यात का उगवते? |
| आजी: | पाणी अशुद्ध, प्रदूषित झालं की उगवते. |
| नीता: | आजी, आपल्यामुळेच नदीचं पाणी प्रदूषित झालयं ना! |
| आजी: | हो, माणसांच्या वाईट सवयींमुळे नदीची हानी होत आहे. शहराच्या सांडपाण्यातून, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील किंवा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही द्रव्ये पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते. जलपर्णीची वाढ ही खऱ्या अर्थाने जलप्रदुषणाची निदशर्क आहे. |
| नीता: | अरेरे! आजी, आता याजलपर्णीचं काय करायचं? |
| आजी: | पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यायची. |
नदीचे पाणी कशामुळे प्रदूषित होते?
लघु उत्तरीय
Advertisements
उत्तर
नदीचे पाणी माणसाच्या वाईट सवयींमुळे प्रदूषित होते. शहरातून सोडले जाणारे सांडपाणी, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेतजमिनीतून झिरपणारे पाणी किंवा कारखान्याच्या सांडपाण्यामधील नायट्रोजन व फॉस्फरस या द्रव्यांमुळे नदीचे पाणी प्रदूषित होते.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
