Advertisements
Advertisements
प्रश्न
उत्तार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृतिबंध पूर्ण करा: 2

|
ज्याप्रमाणे मनुष्यप्राण्याला अन्नाची जरुरी आहे, त्याप्रमाणे सर्वांना विद्येची जरुरी आहे. विद्या ही दुधारी तलवारीसारखी असते. विद्येने दुष्टांचा संहार करता येतो व दुष्टांपासून रक्षणही करता येते. माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही. प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, शील म्हणजे सदाचरणयुक्त असं आचरण, करुणा म्हणजे सर्व मानवजातीसंबंधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणिमात्रांविषयीची आत्मीयता. विद्येबरोबर या चार पारमिता असल्या पाहिजेत, तरच विद्वत्तेचा काही उपयोग आहे. विद्येबरोबर मानवाजवळ करुणा नसली तर तो दानव आहे, असं मी समजतो. विद्या, प्रज्ञा, करुणा, शील आणि मैत्री या पंचतत्त्वांनुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनवले पाहिजे आणि या मार्गाने एकट्याने जावे लागले, तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे. |
(2) योग्य जोड्या लावा: 2
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (i) करुणेशिवाय मानव | (अ) विद्या |
| (ii) दुधारी तलवार | (ब) अन्नाची जरुरी |
| (iii) मानवजातीसंबंधी प्रेमभाव | (क) दानव |
| (iv) मनुष्यप्राणी | (ड) करुणा |
Advertisements
उत्तर
(1)

(2)
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (i) करुणेशिवाय मानव | (क) दानव |
| (ii) दुधारी तलवार | (अ) विद्या |
| (iii) मानवजातीसंबंधी प्रेमभाव | (ड) करुणा |
| (iv) मनुष्यप्राणी | (ब) अन्नाची जरुरी |
