Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान सकारण स्पष्ट करा:
समानतेचे तत्त्व महत्त्वाचे आहे.
औचित्य
Advertisements
उत्तर
- व्यवस्थापनाने आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य व मैत्रीपूर्ण वागणूक दिली पाहिजे. व्यवस्थापकांनी आपल्या अधीनस्तांशी दयाळू, निष्पक्ष व न्याय्य वर्तन केले पाहिजे.
- कामाचे विभाजन करताना, अधिकार सोपवताना व आर्थिक अटी ठरवताना कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव करता कामा नये. वेतन देताना देखील समान पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान वेतन दिले पाहिजे.
- कर्मचाऱ्यांचे वेतन ते कोणत्या विभागात काम करतात यावर नव्हे, तर ते कोणत्या पातळीवर काम करतात यावर अवलंबून असले पाहिजे. उदाहरणार्थ, मुख्याधिकारीला त्याच्या अधीन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त वेतन दिले पाहिजे.
- कामाचे वाटप करतानाही भेदभाव करता कामा नये. शक्य तितके समान कामाचे वितरण केले पाहिजे. अशा प्रकारच्या समतेमुळे संघटनेतील वादविवाद टळतात, कर्मचाऱ्यांचा मनोबल वाढतो आणि संस्थेबद्दल निष्ठा निर्माण होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
