Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर १५० ते २०० शब्दांमध्ये लिहा.
ग्रामीण समुदायातील समस्यांची चर्चा करा व त्या समस्या सोडविण्यासाठी उपाय सुचवा.
पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर १५० ते २०० शब्दांमध्ये लिहा.
ग्रामीण समुदायाच्या कोणत्याही पाच समस्यांची चर्चा करा व त्या सोडवण्यासाठी उपाय सुचवा.
सविस्तर उत्तर
Advertisements
उत्तर
ग्रामीण समुदायाच्या समस्या:
- दारिद्र्य: ग्रामीण भागातील बहुसंख्य लोकसंख्या दरिद्री, बेरोजगारी आणि दयनीय आर्थिक परिस्थितीमध्ये जीवन जगतात. लहान व सीमांत शेतकरी, कृषी कामगार, ग्रामीण कारागीर हे मोठ्या प्रमाणावर गरीब आहेत. ते त्यांच्या मुलभूत गरजाही पूर्ण करू शकत नाहीत.
- निरक्षरता: शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात निरक्षरता मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण शिक्षणासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद नसल्याने आजही मुले आणि प्रौढांमध्ये निरक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा देखील गंभीर चिंतेचा विषय आहे.
- पारंपारिकता, पुराणमतवाद आणि अंधश्रद्धा: ग्रामीण भारताला आजही एक रूढीवादी समाज म्हणता येईल कारण तो अजूनही पारंपारिक मानसिकता, श्रद्धा आणि जीवनशैलींना धरून आहे. ग्रामीण लोक बदलण्यास मंद असतात आणि सवयी किंवा भीतीमुळे अनेकदा बदलांना विरोध करतात.
- जातिव्यवस्थेचा प्रभाव: पारंपारिक हक्क, अधिकार आणि जातीच्या पदानुक्रमावर आधारित निर्बंध आज स्पष्ट नसतील. तथापि, ते लोकांच्या मनात खोलवर रुजलेले आहे आणि परस्परसंवादांमध्ये पसरलेले आहे.
- शेतकऱ्यांच्या आत्महत्या: भारतातील बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही चिंतेची बाब आहे. बहुतांश शेतकरी आर्थिक कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतात.
- स्त्रियांचे दुय्यम स्थान: कुटुंब, धर्म, चालीरीती आणि परंपरा यांच्या नियंत्रणामुळे, ग्रामीण भागात महिलांना दुय्यम स्थान आहे. पितृसत्ताक मूल्ये सामाजिक जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये पसरली आहेत, ज्यामुळे भेदभावपूर्ण प्रथा आणि लिंगभेद निर्माण होतात.
- कौटुंबिक वाद: जमिनीच्या मालकीवरून ग्रामीण भागांमध्ये कौटुंबिक वाद होणे ही बाब नवीन नाही. अशा तंट्यांमुळे अनेक संयुक्त कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. कुटुंबातील अनेक सदस्यांमध्ये जमिनीची वाटणी झाल्याने जमिनीच्या तुकड्यांवर पिक घेणे शक्य होत नाही. मालमत्तेच्या तंट्यांमुळे ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे साहजिकच, त्यांच्या पुढील पिढीला वादग्रस्त जमिनीवर शेती व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळत नाही.
ग्रामीण समुदायाच्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना:
- कृषी व संबंधित उद्योगांव्यतिरिक्त ग्रामीण भागात अन्य रोजगार संधी निर्माण केल्या जाऊ शकतात. यामुळे ग्रामीण लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच, सरकारने मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजना राबवाव्यात.
- ग्रामीण शिक्षणासाठी उच्च अर्थसंकल्पीय तरतुदी या क्षेत्रातील निरक्षरतेच्या समस्येवर मात करण्यास मदत करू शकतात.
- ग्रामीण लोकांची रूढीवादी मानसिकता बदलण्यास शिक्षण मदत करू शकते. चुकीच्या परंपरा आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम आणि प्रसारमाध्यमांचा वापर करावा.
- ग्रामीण समाजातील लोकांनी जातीभेद न करता परस्पर सहकार्य करावे. विशेषतः सण आणि उत्सवांमध्ये सकारात्मक सामाजिक संबंध प्रस्थापित करावेत.
- शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाऊ शकते. त्यांना सवलतीच्या दरात बियाणे, कीटकनाशके आणि खते प्रदान करणे देखील शक्य आहे. अंतिम ग्राहकांना थेट विक्री करण्यास सक्षम करण्यासाठी सुविधा निर्माण करता येतील.
- ग्रामीण भागातील महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम केले पाहिजे. महिला उद्योजकांसाठी विशेष सहाय्य योजनांची अंमलबजावणी केली जाऊ शकते.
- जमिनीच्या मालकी हक्कांवरील वाद वेगाने आणि न्याय्य पद्धतीने सोडवले जावेत.
shaalaa.com
Notes
Students should refer to the answer according to their questions.
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
