मराठी

खालील काव्यपंक्तीचे संदर्भासह स्पष्टीकरण लिहा. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील काव्यपंक्तीचे संदर्भासह स्पष्टीकरण लिहा.

दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

प्रस्तुत ओळी नारायण सुर्वे यांच्या ‘दोन दिवस’ या अत्यंत गाजलेल्या कवितेतील आहेत. या कवितेत कवीने कामगारांच्या संघर्षाचे आणि गरिबीचे अत्यंत दाहक वास्तव मांडले आहे. कवी म्हणतात की, त्यांचे संपूर्ण आयुष्य हे ‘भाकरीचा चंद्र’ शोधण्यात, म्हणजेच पोटाची खळगी भरण्याच्या विवंचनेत गेले.
या भीषण गरिबीच्या प्रवासात कवीला दुनियेच्या अनुभवांची एक वेगळीच ‘शाळा’ मिळाली. कवीच्या मते, आयुष्यात केवळ दु:ख आले म्हणून खचून जाणे योग्य नाही. उलट, ते दु:ख पेलण्याची ताकद कशी मिळवावी आणि त्या दु:खाच्या डोंगराखाली दबून न जाता, पुन्हा नव्या उमेदीने जिद्दीने कसे जगावे, याचे धडे त्यांना याच अनुभवांच्या शाळेत मिळाले. जगाच्या या शाळेत त्यांनी दु:खाला आपलेसे करून त्यावर मात करण्याची कला आत्मसात केली. मानवी जीवनातील संघर्षातून तावून-सुलाखून निघून अधिक प्रगल्भ कसे व्हावे, हा मोलाचा संदेश या ओळींतून व्यक्त होतो.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×