मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

'दु:ख पेलावे आणि पुन्हा जगावे', या वाक्यामागील तुम्हांला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'दु:ख पेलावे आणि पुन्हा जगावे', या वाक्यामागील तुम्हांला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

'दोन दिवस' ही कवी नारायण सुर्वे यांची कविता कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करते. नेहमी जगाच्या सुखाचा विचार करणारा हा कष्टकरी या जगातच रममाण होऊन जगतो. दारिद्र्याचे चटके सहन करत, सतत येणाऱ्या अडचणी, दु:खे पेलून, त्यावर मात करून तो आपले जीवन जगतच राहतो. हे सर्व सहन करण्याची, संकटांवर, दु:खावर मात करण्याची शिकवण जगाच्या शाळेत त्याला मिळते. त्यामुळे, तो कधीही दु:खाचा बाऊ करत नाही किंवा निराशेने खचून जात नाही. आपणही त्याच्याप्रमाणे जीवनात येणाऱ्या दु:खातून, अडचणींतून वाट काढत आयुष्य नव्याने जगायला शिकायला हवे असा प्रेरणादायी विचार वरील ओळींतून लक्षात येतो.

shaalaa.com
दोन दिवस
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: दोन दिवस - कृती [पृष्ठ १८]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 दोन दिवस
कृती | Q (४)(आ) | पृष्ठ १८

संबंधित प्रश्‍न

एका शब्दांत उत्तर लिहा.

कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - ______


एका शब्दांत उत्तर लिहा.

कवीचा जवळचा मित्र - ______


खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

कलम केलेले हात


कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.


'कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात - 


पुढील कवितेच्या त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८)

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो

दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

मुद्दे:

१. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री- (०१)

२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)

३.कवितेतील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा. (०२)

‘शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.’

४. कवितेत आलेल्या शब्दांचे अर्थ लिहा. (०२)

१. रात्र -

२. साहाय्य -

३. शेकावे -

४. चंद्र -

५. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - (०२)


खालील ओळींचे रसग्रहण करा.

दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो.
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. दारिद्र्याकडे गहाण पडलेले - ______
  2. कवीचा जवळचा मित्र - ______

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

  1. फुलले - 
  2. धुंद -
  3. झोतभट्टी - 
  4. पोलाद - 

४. काव्यसौंदर्य: (2)

‘हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’, या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.

मुद्दे ‘दोन दिवस’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘झोतभट्टीत शेकावे पोलाद। तसे आयुष्य छान शेकले।।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) वाळविले -
(ii) पेलावे - 
(iii) हरघडी - 
(iv) अगा -

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

1. एका शब्दात उत्तर लिहा.     (2)

  1. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट -
  2. कवीचा जवळचा मित्र -

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो.
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

2. कृती पूर्ण करा.      (2)

  1. कवीचा प्रयत्नवाद व आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
  2. 'दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात', या शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

3. पुढील शब्दांचा अर्थ लिहा.      (2)

  शब्द अर्थ
1. दारिद्र्य ______
2. हरघडी ______
3. साहाय्य ______
4. दुनिया ______

4. 'कवितेत व्यक्‍त झालेले जीवनसत्य', याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.  (2)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×