मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

‘आळसें सुख मानूं नये’, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘आळसें सुख मानूं नये’, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

‘उत्तम लक्षण’ या ओव्यांमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे, असे ठासून प्रतिपादिले आहे.

‘आळस’ हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. आळसामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात. ‘आळसे कार्यभाग नासतो!’ या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्त्व सांगितले आहे. माणसाच्या मनाला जे षड्विकार जडतात, त्यात ‘आळस’ हा एक विकार आहे. दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्य अंधारते. आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सुख मानू नये, समाधान मानू नये, असे समर्थ रामदास सांगतात.

shaalaa.com
उत्तमलक्षण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: उत्तमलक्षण - कृती [पृष्ठ १०]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 4 उत्तमलक्षण
कृती | Q (४) (इ) | पृष्ठ १०

संबंधित प्रश्‍न

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.

तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा.


खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.

तोंडाळ


खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.

संत


खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.

गोष्टी दक्षता
(१) आळस ______
(२) परपीडा ______
(३) सत्यमार्ग ______

खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा.

‘जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये।
 पुण्यमार्ग सोडूं नये। कदाकाळीं।।’


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

उत्तमलक्षण

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) कोष्टक पूर्ण करा.  (२)

श्रोतीं व्हावें सावधान। आतां सांगतों उत्तम गुण।
जेणें करितां बाणे खुण। सर्वज्ञपणाची।।१।।

वाट पुसल्याविण जाऊं नये। फळ ओळखिल्याविण खाऊं नये।
पडिली वस्तु घेंऊ नये। येकायेकीं।।२।।

जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये।
पुण्यमार्ग सोडूं नये। कदाकाळीं।।३।।

तोंडाळासीं भांडों नये। वाचाळासीं तंडों नये।
संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं।।४।।

आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये।
शोधिल्याविण करूं नये। कार्य कांही।।५।।

सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।
पैज होड घालूं नये। कांहीं केल्या।।६।।

कोणाचा उपकार घेऊं नये। घेतला तरी राखों नये।
परपीडा करूं नये। विश्वासघात।।७।।

व्यापकपण सांडूं नये। पराधेन होऊं नये।
आपलें वोझें घालूं नये। कोणीयेकासी।।८।।

सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये।
कदा अभिमान घेऊं नये। असत्याचा।।९।।

अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।
विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची।।१०।।

२) खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.  (२)

क्र. गोष्टी उत्तर दक्षता
i. आळस ______ मानू नये.
ii. परपीडा ______ वागू नये.
iii. सत्यमार्ग ______ नये.
iv. सभेतील वर्तन ______ नये.

३) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा.  (२)

सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये।
कदा अभिमान घेऊं नये। असत्याचा।

४) खालील काव्यपंक्तींतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा.  (२)

तोंडाळासी भांडो नये। वाचाळासीं तंडों नये।
संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं।


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

उत्तमलक्षण

  1. प्रस्तुत कवितेच्या कवीचे/ कवयित्रीचे नाव लिहा.  (१)
  2. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश.  (१)
  3. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।
विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची।


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×