Short Note
‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
Advertisement Remove all ads
Solution
'संतकृपा झाली' या अभंगात संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या इमारत उभारणीमध्ये संतांचा किती मोलाचा वाटा आहे याचे वर्णन केले आहे.
संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया घातल्यानंतर नामदेवांनी त्याचा प्रचार व प्रसार केला. त्यानंतर संत तुकारामांनी ही परंपरा पुढे नेली. त्यांनी या इमारतीवर जणू कळस चढवला. म्हणजेच, त्यांनी वारकरी संप्रदायाला परिपूर्ण वैभव प्राप्त करून दिले. अशा या देवालयात आपण शांतचित्ताने भजन करून, भगवद्भक्तीचा आनंद लुटावा, असे बहिणाबाई प्रस्तुत ओळीतून सांगत आहेत.
Concept: पद्य (9th Standard)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads