Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, याविषयी तुमचे मत लिहा.
Advertisement Remove all ads
Solution
शब्दकोडे सोडवताना आपल्या भाषिक ज्ञानाचा कस लागतो. पर्यायाने, शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते हे मला पटते. शब्दकोडे सोडवताना आपल्याला नवनवीन शब्दांचे ज्ञान मिळते त्यामुळे शब्दसंपत्तीत भर पडते. यामुळे, आपला शब्दसंग्रह वृद्धिंगत होतो. शिवाय, शब्दकोड्यामुळे भाषेची गंमतही अनुभवता येते. एकाच शब्दाच्या अनेक अर्थछटा माहीत होतात. यामुळे, शब्दसंपदा वाढण्यास मदत होते. परिणामत: शब्दचातुर्य विकसित होते. एकूणच, यामुळे भाषा समृद्ध होते, शब्दांचे उत्तम ज्ञान असणे हे आजच्या युगात फार महत्त्वाचे असल्याने; शब्दकोडे हे भाषावृद्धीचे एक प्रभावी साधनच ठरते.
Concept: स्थूल वाचन (9th Standard)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads