Short Note
‘सैनिक सीमेवर तैनात असतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो’, या विधानातील भाव स्पष्ट करा.
Advertisement Remove all ads
Solution
आपले प्राण तळहातावर घेऊन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सुसज्ज असणाऱ्या जवानांमुळेच देशातील सर्वसामान्य जनता निर्धास्त जगू शकते, आपले रोजचे काम करू शकते, मुक्तपणे वावरू शकते. ते सीमेवर थंडी, ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता, डोळ्यांत तेल घालून कार्यरत असतात, त्यामुळेच आपण सुख-समाधानाने, शांतपणे आपले आयुष्य जगू शकतो. ते आपले घरदार, कुटुंब सोडून देशाकरता प्राण देण्यास तयार असतात, त्यामुळे आपली घरेदारे, शेतीभाती, आपले परिवार सुरक्षित असतात.
म्हणूनच, या सैनिकांच्या सर्वोच्च त्यागाबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात कृतज्ञतेची भावना असते. ही कृतज्ञतेची भावना ’सैनिक सीमेवर तैनात असतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो“ या विधानातून व्यक्त होते.
Concept: पद्य (10th Standard)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads