खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा.
शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।
Solution
'स्वप्न करू साकार' या कवितेत कवी किशोर पाठक यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न चित्रित केले आहे. प्रस्तुत कवितेत कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकतेचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
या देशात उगवणारी फुले, येथील मुले यांच्या प्रसन्नतेतून जणू येथला श्रावण खुलतो. येथील माती ही मंगलमय आहे. सर्वत्र जणू चैतन्यमयी वातावरण असते. येथील सुजलाम्, सुफलाम् धरतीतून आम्ही धान्यरूपी धन भरभरून पिकवू. त्यातून भरपूर संपत्ती प्राप्त होईल, असा प्रेरणादायी आशय प्रस्तुत काव्यपंक्तींतून कवी व्यक्त करू पाहतात. येथे कवी धान्याला मोत्यांची उपमा देतात. शेतीच्या विकासामुळेच देशाची भरभराट होईल, समृद्धी नांदेल ही महत्त्वाची गोष्ट ते ठळकपणे दाखवून देतात. कृषिसंस्कृतीचे दर्शन यातून आपल्याला घडते. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून शेत जणू मोती पिकवेल आणि त्यातून कधीही न संपणारे असे अपरंपार धन मिळेल, असे देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न कवी प्रस्तुत ओळींतून नेमकेपणाने मांडतात.