Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
उत्तमलक्षण
- प्रस्तुत कवितेच्या कवीचे/ कवयित्रीचे नाव लिहा. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (१)
- कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)
Advertisement Remove all ads
Solution
- कवी - संत रामदास
- सर्वज्ञपणा अंगी यावा याकरता समर्थ रामदासांनी 'उत्तमलक्षण' या रचनेत सर्वसामान्य लोकांना आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्श व्यक्तीने सामाजिक व वैयक्तिक जीवनात कसे वागावे व कसे वागू नये, काय करावे व काय करू नये, याचे मार्गदर्शन या रचनेतून ते करतात.
- 'उत्तमलक्षण' या कवितेत संत रामदास यांनी आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट केली आहे. 'काय करावे' व 'काय करू नये' यांबाबतचे त्यांचे मार्गदर्शन मला विशेष आवडले. परपीडा, उपकार यांसारख्या उपसर्गघटित, तर सत्यमार्ग यांसारख्या सामासिक शब्दांचा वापर केल्यामुळे मराठी भाषेची समृद्धी या कवितेतून जाणवते. प्रत्येक ओवीच्या पहिल्या तीन चरणांत 'नये' या शब्दाची पुनरावृत्ती होऊन यमक साधले आहे. यामुळे, कविता नादमय झाली आहे. तसेच, ही कविता आपल्याला जीवन कसे जगावे याचा आदर्शच घालून देते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे मला ही कविता खूप आवडते.
Concept: पद्य [इयत्ता १० वी]
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads